बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील बदलापूर आणि वांगणी परिसराला मागील काही दिवसांपासून वादळी वारा आणि मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या या रौद्र रूपामुळे संपूर्ण परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर वांगणी भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक अंधारात आहेत.
- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने नियंत्रण मिळवण्यासह तंत्रज्ञानावर ...
वाहन आणि मालमत्तेचे मोठे नुकसान
बुधवारी रात्रीच्या सुमारास आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बदलापूर शहरात चार ते पाच ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर आणि वाहनांवर कोसळली. या दुर्घटनेत सुमारे ३ ते ४ वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दुसरीकडे, वांगणी परिसरातील अनेक घरांवरील आणि इमारतींवरील छतांचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले आहेत. यामुळे नागरिकांच्या संसारोपयोगी साहित्याचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि पर्यटनाला गती ...
दोन दिवसांपासून 'बत्ती गुल' आणि मोबाईल नेटवर्क गायब
वांगणी आणि आसपासच्या ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. सलग दोन दिवस वीज नसल्यामुळे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांचे हाल होत आहेत. तसेच, मोबाईल नेटवर्क खंडित झाल्यामुळे आपत्कालीन संपर्कात अडथळा निर्माण झाला आहे. नागरिकांना एकमेकांशी संपर्क साधता येत नसल्याने आणि वीज नसल्यामुळे तीव्र उकाडा व अंधाराचा सामना करावा लागत आहे.
Nashik TCS Case : नाशिकमधील नव्हे तर राज्यातील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील कथित लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणात आता आणखी दोघांना जामीन मंजूर झाला ...
शाळांना सुट्टी व प्रशासनाची सतर्कता
मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पडलेली झाडे आणि सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने तसेच काही शाळांनी खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले असून पिकांवर संकट ओढवले आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवून नुकसान भरपाई आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असले, तरी नागरिकांमधील चिंतेचे वातावरण अद्याप कायम आहे.