Shivsena : खासदार विलीनीकरण प्रकरणात लोकसभा अध्यक्षांसह ६ बंडखोरांना नोटीस

मुंबई : उबाठा गटाच्या ६ खासदारांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी नुकतीच मंजुरी दिली होती. या निर्णयाविरोधात उबाठा गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर प्राथमिक सुनावणी घेत न्यायालयाने लोकसभा अध्यक्ष, लोकसभा सचिवालयाचे सचिव आणि संबंधित ६ खासदारांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सर्व प्रतिवादींना उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला असून, त्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.


लोकसभा निवडणुकीत उबाठा गटाचे ९ खासदार निवडून आले होते. त्यापैकी दोन-तृतीयांश म्हणजेच ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिकृत मान्यता दिल्यानंतर लोकसभेत शिवसेनेचे संख्याबळ १३ वर पोहोचले, तर उबाठा गटाकडे ३ खासदार उरले. या निर्णयाला उबाठा गटाने राज्यघटनेच्या १० व्या अनुसूचीतील तरतुदींचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.



मूळ पक्षाचे विलीनीकरण झालेले नसताना, खासदारांच्या गटाचे विलीनीकरण कायदेशीर चौकटीत बसत नाही, असा उबाठा गटाचा दावा आहे. तर, २/३ पेक्षा जास्त लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन घेतलेला हा निर्णय घटनात्मक तरतुदींनुसारच असल्याचे शिवसेनेचे आणि सत्ताधारी पक्षाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील तातडीच्या स्थगितीची मागणी तूर्तास बाजूला ठेवत, सर्व पक्षांची बाजू आणि उत्तर ऐकण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ दिला आहे. त्यामुळे दोन आठवड्यांत येणाऱ्या उत्तरांनंतर सर्वोच्च न्यायालय या विलीनीकरणाच्या वैधतेबाबत काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण देशाचे आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण