Nashik : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नांदूर मध्यमेश्वर (Nandur Madhmeshwar) बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. बुधवारी (२२ जुलै) दुपारी १ वाजल्यापासून बंधाऱ्यातून ४,७६९ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने (Water Resources Department) केले आहे.
लंडन: फुटबॉल जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. २०२६ च्या विश्वचषक स्पर्धेत पंच म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे प्रसिद्ध इंग्लिश रेफरी अँथनी टेलर ...
विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता
जलसंपदा विभागाच्या (Water Resources Department) पूर नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी ३,२२८ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र दुपारी १ वाजता त्यात १,५४१ क्युसेक्सने वाढ करून एकूण विसर्ग ४,७६९ क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता येत्या काही तासांत विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Nashik Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. ...
गोदावरीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
गोदावरी नदीकाठच्या तसेच नदीपात्रालगतच्या सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये, तसेच नदीकाठावर ठेवलेले साहित्य व जनावरे तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित प्रशासकीय विभागांना आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.