सहकार विभागाकडून प्रक्रिया सुरू
मुंबई : राज्यातील बळीराजाला कर्जाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनें'तर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. २२ जुलै रोजी जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी दिली.
पेपर फोडणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारच! नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'नीट' (NEET) पेपर फुटी प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. मंगळवारी ...
मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि त्यांच्या विभागाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. अजितदादांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्याचा सरकारचा पूर्ण प्रयत्न राहील. तर दुसरीकडे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीच्या प्रक्रियेतील सर्व तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून, आयकर डेटा संदर्भातील माहितीही प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे अजितदादांची जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक यादी प्रसिद्ध केली जाईल. तसेच, राज्यात बोगस बियाणे विक्रीप्रकरणी ११ हजार ५८४ तक्रारींच्या आधारे कारवाईचा धडाका सुरू असून आतापर्यंत ८१ कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, महायुती सरकारने यापूर्वीच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’तील जाचक अटी रद्द करून ३६ लाख अतिरिक्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. सन २०१९ च्या कर्जमाफीतील लाभार्थ्यांसाठी असलेली ५० हजारांची मर्यादा रद्द करून ती २ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सुमारे २३ लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी नवीन कर्जाची उचल करण्याची अटही रद्द करण्यात आली आहे.






