मुंबई : भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navnath ban) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ( Uddhav Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay raut) आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. देशातील तरुण वर्ग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असून, तरुणांना भडकवून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा दावा त्यांनी केला.
मुंबईतील भाजप (BJP) प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बन म्हणाले की, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशांनुसार कारवाई केली आहे. स्टार्टअप, मेक इन इंडिया आणि इतर उपक्रमांमध्ये देशातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने त्यांचा सरकारवरील विश्वास कायम असल्याचे त्यांनी सांगितले.
- गृहराज्यमंत्री योगेश कदम; तटकरे आणि रामदास कदम यांच्यातील वाद चिघळला मुंबई : कोकणातील महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ...
आदित्य ठाकरे यांच्या आंदोलनावर टीका करताना त्यांनी भगव्या विचारांपासून दूर जाण्याचा आरोप केला. हिंदुत्वाच्या भूमिकेवर ठाम राहूनच नेतृत्व करता येते, असेही त्यांनी म्हटले. तसेच उद्धव ठाकरे यांनी रामाच्या नावाने आंदोलन करण्याऐवजी आपल्या पक्षाच्या भवितव्याचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला.Maharashtra Politics
संजय राऊत यांच्यावर टीका करताना नवनाथ बन यांनी ईडी (ED) आणि इतर तपास यंत्रणांबाबत केलेल्या वक्तव्यांचा उल्लेख केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तपास यंत्रणा कारवाई करत असल्याचे सांगत त्यांनी ईडीवर टीका करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. पत्राचाळ प्रकरणाचाही त्यांनी उल्लेख केला. (Shiv Sena UBT)
मुंबई : पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला (Protest) पाठिंबा देण्यासाठी उबाठा गटाच्या वतीने मुंबईतील (Mumbai) दादर परिसरात रविवारी करण्यात ...
याशिवाय, निवडणूक आयोग आणि केंद्रीय संस्थांबाबत विरोधकांची भूमिका परिस्थितीनुसार बदलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. निकाल अनुकूल आला तर संस्थांचे कौतुक आणि प्रतिकूल आला तर त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, अशी टीका त्यांनी केली. (Sanjay Raut News)
दरम्यान, भाजपच्या या टीकेला ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.