पोहायला गेलेले चार मित्र समुद्रात वाहून गेले, दोघांची सुटका तर दोघांचा शोध सुरू
पालघर : पावसाळ्यात समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या चार मित्रांवर काळाने घाला घातला. पालघर (Palgahr) जिल्ह्यातील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर अंघोळीसाठी उतरलेल्या चार तरुणांपैकी दोघांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, अन्य दोघे समुद्रात बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. ( Arnala Beach)
मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत मुंबई : मुंबईच्या वांद्रे (Bandra) परिसरातून कथितरित्या अपहरण (Kidnapping) ...
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील चार तरुण अर्नाळा (Arnala) समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. पावसाळ्यामुळे समुद्राला उधाण आलेले असतानाही ते अंघोळीसाठी पाण्यात उतरले. त्याचवेळी आलेल्या जोरदार लाटेने चौघांनाही खोल समुद्रात खेचले.
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत ...
दोघांची सुटका
घटना लक्षात येताच स्थानिक नारिकांनी आरडाओरडा केला. त्यानंतर लाइफगार्ड, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर अबुल हसमुद्दीन शेख आणि मोसाद अफसर खान यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
दोन जण बेपत्ता
मात्र, शोएन खान आणि अयान जाकीर हुसेन हे दोघे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. समुद्रात मोठी भरती आणि प्रचंड लाटांमुळे शोधमोहीम राबवताना बचाव पथकाला अडचणी येत आहेत.
दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी नागरिकांना पावसाळ्यात समुद्रात उतरणे टाळण्याचे आवाहन केले आहे. समुद्र खवळलेला असताना जीव धोक्यात घालू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी सांगितले.