Arnala Beach : अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर दुर्दैवी घटना! चौघेजण पोहायला गेले अन् काळाने घात घातला; दोन जण बेपत्ता

 पोहायला गेलेले चार मित्र समुद्रात वाहून गेले, दोघांची सुटका तर दोघांचा शोध सुरू




पालघर : पावसाळ्यात समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या चार मित्रांवर काळाने घाला घातला. पालघर (Palgahr) जिल्ह्यातील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर अंघोळीसाठी उतरलेल्या चार तरुणांपैकी दोघांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून, अन्य दोघे समुद्रात बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. ( Arnala Beach)



मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा येथील चार तरुण अर्नाळा (Arnala) समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेले होते. पावसाळ्यामुळे समुद्राला उधाण आलेले असतानाही ते अंघोळीसाठी पाण्यात उतरले. त्याचवेळी आलेल्या जोरदार लाटेने चौघांनाही खोल समुद्रात खेचले.




दोघांची सुटका


घटना लक्षात येताच स्थानिक नारिकांनी आरडाओरडा केला. त्यानंतर लाइफगार्ड, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर अबुल हसमुद्दीन शेख आणि मोसाद अफसर खान यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.



दोन जण बेपत्ता


मात्र, शोएन खान आणि अयान जाकीर हुसेन हे दोघे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. समुद्रात मोठी भरती आणि प्रचंड लाटांमुळे शोधमोहीम राबवताना बचाव पथकाला अडचणी येत आहेत.


दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी नागरिकांना पावसाळ्यात समुद्रात उतरणे टाळण्याचे आवाहन केले आहे. समुद्र खवळलेला असताना जीव धोक्यात घालू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास