Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. १६ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध आकडेवारीनुसार सातही तलावांमध्ये एकूण ५,३३,५२३ दशलक्ष लिटर (एमएल) पाणीसाठा जमा झाला असून, तो एकूण क्षमतेच्या ४८.६६ टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. (Mumbai Water Stock)


महापालिकेच्या अहवालानुसार, भातसा तलावात सर्वाधिक १,४२,७२० मिमी पावसाची नोंद झाली असून, मोडक सागरात १,३३६ मी, तानसा तलावात १,४२५ मिमी, मध्य वैतरणा येथे १,०८१ मिमी, वरच्या वैतरणा येथे ९१० मिमी, विहार येथे ७८१ मिमी आणि तुळशी येथे १,१४० मिमी पाऊस झाला आहे.



दरम्यान, विहार तलावाने ७ जुलै रोजी रात्री ९ वाजता ओव्हरफ्लो होण्यास सुरुवात केली, तर तुळशी तलाव ७ जुलै रोजी रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी भरून वाहू लागला आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य वैतरणा जलाशयातून ६ जुलै रोजी सकाळी १० वाजून ७ मिनिटांनी पाणी सोडणे बंद करण्यात आले, तर वरच्या वैतरणा तलावातून ६ जुलै रोजी रात्री १० वाजून ८ मिनिटांनी विसर्ग थांबवण्यात आला. (Mumbai Water Stock)



याशिवाय, भांडूप संकुलात १६ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत १७३१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आगामी काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित तलावांमधील जलसाठ्यातही आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Mumbai Water Stock)

Comments
Add Comment

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा