Chandrashekar Bawankule : मानखुर्दमधील २५० श्रमिक कुटुंबांच्या घरांसाठी सकारात्मक निर्णय घेऊ

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी घेतली भेट


मुंबई : मानखुर्द (पूर्व) मंडाला येथील २५० श्रमिक कुटुंबांच्या घरांच्या प्रश्नावर शासन नियमांच्या चौकटीत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करेल, अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिली. (Bawankule)



मेधा पाटकर यांनी गुरुवारी महसूल मंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन मानखुर्द (पूर्व)मंडाला परिसरातील स्वयंविकास योजनेअंतर्गत होत असलेल्या सुमारे २५० श्रमिक कुटुंबांच्या घरांच्या प्रश्नासंदर्भात सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबे अनेक वर्षांपासून त्या परिसरात वास्तव्यास असून, त्यांच्या पुनर्वसन व घरांच्या प्रश्नावर तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. तसेच संबंधित जागेची कागदपत्रे, विविध शासकीय विभागांशी झालेला पत्रव्यवहार आणि यापूर्वी झालेल्या कार्यवाहीची माहितीही त्यांनी महसूल मंत्र्यांसमोर मांडली. तसेच त्यांनी या गरीब कुटुंबांच्या स्वयंविकास गृहनिर्माण प्रकल्पासाठी शासकीय भूखंड हस्तांतरित करण्याची आग्रही मागणी केली. या नियोजित प्रकल्पाचा प्रत्यक्ष पाया रचण्यासाठी मंडाला येथील ६ हजार ७७.५५ चौ. मी. चा भूखंड मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे पाटकर यांनी सांगितले. (Social Work)



यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी निवेदनाची सविस्तर दखल घेत संबंधित प्रकरणातील सर्व कागदपत्रे आणि वस्तुस्थितीची पडताळणी करून कायदेशीर व प्रशासकीय बाबींचा सर्वंकष आढावा घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळेल, यासाठी नियमांच्या अधीन राहून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील

Devendra Fadnavis : महाराष्ट्राला सर्वाधिक सुलभ शासकीय सेवा देणारे राज्य बनवा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; गव्हर्नन्स प्रोसेस रि-इंजिनियरिंग संदर्भात तिसऱ्या टप्प्याची बैठक मुंबई : राज्य

Mumbai News : पवई-विहार तलाव परिसरातील अवैध बांधकामांवर खासदार रवींद्र वायकर आक्रमक; केंद्राकडे तातडीच्या कारवाईची मागणी

मुंबई : पवई, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध बांधकामांमुळे येथील जैवविविधता धोक्यात आली

Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा मुंबई : राज्याच्या बहुतांश

Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि...

मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत मुंबई : मुंबईच्या वांद्रे

Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत