Ketan Agrawal Murder : 'माझ्या मुलाला न्याय द्या', पुणे व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या आईचे पंतप्रधान मोदींना भावनिक पत्र

पुणे : पुण्यात हत्या (Murder) झालेल्या रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना भावनिक ईमेल पाठवत मुलाच्या हत्येप्रकरणी न्याय मिळवून देण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. (Ketan Agrawal Murder)


पत्रात राखी अग्रवाल यांनी आपल्या वेदना व्यक्त करत, एक दिवस स्वतःच्या मुलासाठी न्याय मागण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहावं लागेल, अशी कल्पनाही कधी केली नव्हती, असे म्हटले आहे. “प्रत्येक आईप्रमाणे मी केतनचं उज्ज्वल भविष्य, त्याचं लग्न आणि आमच्यासोबतचं आयुष्य पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण त्याऐवजी मला माझ्याच मुलावर अंत्यसंस्कार करावे लागले,” अशी हळवी भावना त्यांनी व्यक्त केली. (Pune Crime News)



केतनची हत्या अत्यंत क्रूर असल्याचे सांगत, त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. “केतन गेला, त्या दिवशी माझं जगच संपलं. घरातील प्रत्येक कोपरा, त्याची खोली, कपडे आणि फोटो आजही त्याची आठवण करून देतात,” असे त्यांनी पत्रात लिहिले आहे. (Justice For Ketan Agrawal)


राखी अग्रवाल यांनी पत्रात केतनच्या आजोबांचाही उल्लेख केला. नातवाच्या हत्येचा धक्का सहन न झाल्याने त्यांचे एका महिन्याच्या आत निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे काही आठवड्यांतच कुटुंबावर दोन पिढ्यांचा शोक ओढवला, असे त्यांनी नमूद केले. (Crime)



“मी सहानुभूती किंवा कोणतीही विशेष सवलत मागत नाही. मला फक्त न्याय हवा आहे. कृपया केतनला केवळ आणखी एक प्रकरण म्हणून पाहू नका. तो कोणाचा तरी मुलगा, नातू आणि भाऊ होता; पण माझ्यासाठी तोच माझं सर्वस्व होता,” असे भावनिक आवाहन त्यांनी पंतप्रधानांकडे केले आहे. (Murder)


यापूर्वी केतन अग्रवाल यांच्या वडिलांनीही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली होती. दरम्यान, या हत्येप्रकरणी पोलीस (Pune Police) तपास सुरू असून सर्व संबंधित बाबींचा सखोल तपास केला जात आहे.



Comments
Add Comment

शेतकरी कर्जमाफी योजनेत आणखी २३ लाख शेतकरी पात्र, निकषांत सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी; नियमित कर्ज परतफेडीची अटही शिथिल

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत

Cabinet meeting : मंत्रिमंडळ बैठक संपन्न ! शेतकऱ्यांपासून ते परिवहन मंडळापर्यंत सरकारने घेतले 'हे' मोठे निर्णय

Cabinet meeting : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (१४ जुलै) राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक

Vegetable Price Hike : पावसाचा फटका! राज्यात भाजीपाल्याचे दर दुप्पट; सर्वसामान्यांच्या खिशाला बसली कात्री

मुंबई: राज्यात मागील काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून बाजारात आवक

Beed Cyber Crime : IT इंजिनिअरच ठरला सायबर क्राईमची शिकार; ‘SEBI’चे बनावट प्रमाणपत्र पाठवून IT इंजिनियरची लाखोंची फसवणूक

बीड : बीड जिल्ह्यात सायबर फसवणुकीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तंत्रज्ञानाची चांगली माहिती असलेल्या

Chembur News: चेंबूर वृक्ष दुर्घटनेनंतर महापालिकेचा मोठा निर्णय; कंत्राटदारांना दंड, झाडांच्या सुरक्षेसाठी नवी SOP लागू होणार

चेंबूर (पश्चिम) येथील डायमंड गार्डनजवळ 30 जून 2026 रोजी शाळेच्या बसवर पिंपळाचे झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी

Jalgaon Accident : संसाराची नवी स्वप्न धुळीस! लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू

माहेरी जाताना २१ वर्षीय नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू जळगाव : जळगाव (Jalgaon) शहरात सोमवारी घडलेल्या भीषण अपघातात