Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून अबू धाबीसाठी आठवड्यातून तीन दिवस थेट विमान सेवा

नवी मुंबई विमानतळ : अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) संचलित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (NHIA) नियोजित आंतरराष्ट्रीय विमानसेवेला प्रारंभ झाला असून, एअर इंडिया एक्सप्रेस १५ जुलैपासून नवी मुंबई–अबू धाबी मार्गावर आठवड्यातून तीन दिवस थेट उड्डाण सेवा सुरू करणार आहे.



२५ डिसेंबर २०२५ रोजी देशांतर्गत सेवा सुरू झाल्यानंतर अवघ्या २०० दिवसांतच विमानतळाने आंतरराष्ट्रीय सेवेचा टप्पा गाठला आहे. या सेवेमुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना संयुक्त अरब अमिरातीच्या राजधानी अबू धाबीसाठी थेट आणि अधिक सोयीस्कर हवाई संपर्क उपलब्ध होणार आहे. तसेच, अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जच्या अखत्यारीतील सर्व विमानतळ आता आंतरराष्ट्रीय सेवांशी जोडले गेले आहेत. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल म्हणाले की, "नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासातील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध यंत्रणा, नियामक संस्था तसेच सर्व भागधारकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. पहिल्या आंतरराष्ट्रीय मार्गासाठी एअर इंडिया एक्सप्रेसने दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. येत्या काळात अधिक विमान कंपन्या आणि नव्या आंतरराष्ट्रीय गंतव्यांचा समावेश करत जागतिक दर्जाचा प्रवास अनुभव देण्यावर आमचा भर राहील.(Navi Mumabi)



एअर इंडिया एक्सप्रेसचे अध्यक्ष निपुण अग्रवाल म्हणाले की, "नवी मुंबई विमानतळावरून अबू धाबीसाठी थेट सेवा सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. या मार्गामुळे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांना यूएईसाठी आणखी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल. आमच्या दुहेरी विमानतळ धोरणात नवी मुंबई विमानतळाची महत्त्वाची भूमिका असून, या भागीदारीतून भविष्यात आणखी व्यापक हवाई संपर्क निर्माण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत." अबू धाबी हा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिला आंतरराष्ट्रीय मार्ग असून, लवकरच आणखी अनेक आंतरराष्ट्रीय गंतव्ये या जाळ्यात समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या वाढत्या हवाई वाहतूक क्षमतेला बळ मिळण्यासह भारताच्या आंतरराष्ट्रीय संपर्क, व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे.(Air India)



अवघ्या सात महिन्यांत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने ४६ देशांतर्गत शहरांशी हवाई संपर्क प्रस्थापित करत २३ लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावर दररोज सुमारे १५० हवाई वाहतूक हालचाली होत आहेत. पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणाद्वारे नाशवंत वस्तूंच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय निर्यात मालवाहतुकीलाही सुरुवात झाली आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत अधिक वेगाने पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार असून, विमानतळाच्या मालवाहतूक क्षमतेलाही नवी दिशा मिळणार आहे.

Comments
Add Comment

Prashant Kishor : जनतेने बिहारसाठी 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिला, विजयानंतरची प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया

पाटणा : बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे