Prashant Kishor : जनतेने बिहारसाठी 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिला, विजयानंतरची प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया

पाटणा : बिहारच्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत जन सुराज पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रशांत किशोर यांचा विजय झाला. त्यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा १९ हजार ३२४ मतांनी पराभव केला. प्रशांत किशोर यांना ६४ हजार १५१ मते मिळाली तर नीरज कुमार यांना ४४ हजार ८२७ मते मिळाली. या निकालामुळे भाजपच्या बिहारमधील सरकारच्या स्थैर्याला धक्का लागणार नाही. पण विजयानंतर प्रशांत किशोर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.






जनसुराज पक्षाचे एकमेव आमदार असलेल्या प्रशांत किशोर यांनी विजयानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केलेल्या वक्तव्यातून ते भाजपला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत. बिहारच्या जनतेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला राज्यासाठी एका 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.



बांकीपूर हा विधानसभा मतदारसंघ पाटणा शहरात आहे. अनेक वर्षांपासून हा मतदारसंघ भाजपची हक्काची जागा म्हणून ओळखला जात होता. याच मतदारसंघातून नितीन नवीन आमदार झाले होते. पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राज्यसभेवर निवडून आल्यानंतर आमदारीकीचा राजीनामा दिला. यामुळेच बांकीपूरमध्ये पोटनिवडणूक झाली. भाजपने या पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या नीरज कुमार यांना उमेदवारी दिली तर जन सुराज पार्टीकडून स्वतः प्रशांत किशोर रिंगणात उतरले होते. यामुळे पोटनिवडणुकीत नीरज कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात चुरस होईल असे चित्र निर्माण झाले होते. प्रत्यक्षात मतमोजणीवेळी सुरुवातीपासूनच प्रशांत किशोर आघाडीवर दिसत होते. हळू हळू आघाडी वाढवत प्रशांत किशोर यांनी पोटनिवडणूक जिंकली. निकाल जाहीर झाल्यानंतर बांकीपूरच्या जनतेचा विजय झाल्याचे सांगत प्रशांत किशोर यांनी ही पोटनिवडणूक केवळ आमदार निवडण्यापुरती मर्यादित नव्हती तर जनतेने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला राज्यासाठी एका 'चांगल्या' मुख्यमंत्र्याची निवड करण्याचा संदेश दिल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.



गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा संशयास्पद आचरण, चारित्र्य किंवा प्रतिष्ठा असलेली व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्रिपदी जनतेला नको आहे. त्याऐवजी, बिहारला अशा नेत्याची गरज आहे जो शिक्षण सुधारू शकेल, तरुणांसाठी रोजगार निर्माण करू शकेल आणि लोकांना रोजगाराच्या शोधात इतरत्र स्थलांतर करावे लागणार नाही हे सुनिश्चित करेल. बिहारच्या विकासाला प्राधान्य द्या. बिहार सुधारण्यावर, तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यावर आणि स्थलांतर थांबवण्यावर लक्ष केंद्रित करा. जन सुराज पक्ष आमदार होण्यासाठी नाही तर राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठीच स्थापन केल्याचे प्रशांत किशोर म्हणाले. विजयानंतर जन सुराज पक्षाने प्रशांत किशोर यांची विजयी मिरवणूक काढून जल्लोष केला. पक्षासाठी सुवर्णयुगाची सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया याप्रसंगी कार्यकर्त्यांनी दिली.

Comments
Add Comment

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा

Nashik : मालेगावमध्ये वाद चिघळणार ? टिपू सुलतानच्या प्रतिमेवरून वादाची ठिणगी ; भाजपचा कडक इशारा

Nashik : सहा महिन्यांपूर्वी मालेगावच्या उपमहापौर शान-ए-हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानचे छायाचित्र लावण्यात आले

Nepal Flood : भारतीयांसह एकूण ३८४ पर्यटक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती

काठमांडू : उत्तर नेपाळमध्ये भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरामुळे मोठी दुर्घटना घडली असून, १०५ भारतीय पर्यटकांसह

Kon Honaar Crorepati : माधुरी दीक्षित आता ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर; सूत्रसंचालक म्हणून स्वीकारलेल्या नव्या भूमिकेबद्दल म्हणाली...

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीची 'धक धक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता एका नव्या आणि अनोख्या

Devendra Fadnavis : गर्भवती मातांसाठी मोठी दिलासादायक बातमी; तीव्र रक्तक्षयावर उपचारांना मिळणार वेग

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक