Crime News : चुलत भावासोबत मिळून केली सख्ख्या आई-वडिलांची हत्या ;

मुंबई : आपण आपल्या आई वडिलांवर खूप प्रेम करतो. त्यांना नेहमी सुखात आणि आनंदात ठेवण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट आणि धडपड करत असतो. मात्र काही वेळा नात्यांना काळीमा फासणाऱ्या भयंकर घटना समोर आल्यावर अगदी तळपायाची आग मस्तकात जाते. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या एका अंतिम वर्षातील तरुणीने स्वतःच्या आईची अपघाताचा बनाव रचून हत्या केल्याची धक्कादायक आणि थरारक घटना जयपूर येथे उघडकीस आली आहे.


जयपूर येथील कोर्टात कारकून म्हणून काम करणाऱ्या नीरज शर्मा(Niraj Sharma) यांचा 3 जुलै रोजी एका वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने चिरडल्यामुळे मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा निव्वळ रस्ता अपघात वाटत होता, पण पोलिसांनी जेव्हा सखोल तपास केला, तेव्हा नीरज शर्मा यांची मुलगी आयुषीने कट रचल्याचं समोर आले आहे. या भयानक कटकारस्थानात आयुषीचा चुलत भाऊ बलराम हा देखील सामील असल्याच समजलं आहे. आयुषीने हा अपघात घडवून आणण्यासाठी तब्बल 7 लाख रुपयांची सुपारी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणी हेमंत, आकाश, मोहित, अरविंद आणि रोहित यांना बेड्या ठोकल्या आहेत.(Crime News)



आयुषीने असं का केलं असेल ?


तिने वडील हे विजय शर्मा हे कोर्ट मास्तर होते. त्यांच्या निधनानंतर पत्नी नीरज शर्मा यांना कोर्टात सरकारी नोकरी मिळाली होती. मात्र आयुषी यामुळे निराश होती कारण तिला तिच्या आईच्या जागी ती सरकारी नोकरी हवी होती, तसेच कुटुंबाच्या संपूर्ण मालमत्तेवरही डोळा होता. यामुळे ती तिच्या आईशी सतत वाद घालायची. तिने तिचा चुलत भाऊ बलराम आणि त्याचे वडील मोहन यांनी मिळून नीरज शर्मा यांच्या हत्येचा कट रचला होता.


हत्याकेल्या नंतर संपूर्ण मालमत्तेचे तिघात समसमान वाटप करण्याचे त्यांचे ठरले होते. ती काही काळापासून काका मोहन आणि चुलत भाऊ बलराम यांच्यासोबतच राहत होती. पोलीस तपासात आयुषी आणि बलराम यांच्यात प्रेमसंबंध असल्याचेही समोर आले आहे.



वडिलांची देखीर हत्या केली ;

या प्रकरणात एक आता अत्यंत धक्कादायक वळण आले आहे. आयुषीचे मामा राकेश शर्मा यांनी थेट पोलिसांत धाव घेत आयुषीनेच तिच्या वडिलांचीही हत्या केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. गेल्या वर्षी आजारपणाने मरण पावलेले विजय शर्मा(Vijay Sharma) यांना जेव्हा ब्रेन स्ट्रोक आला होता, तेव्हा आयुषी आणि बलराम यांनी त्यांना एका अज्ञात रुग्णालयात दाखल केले होते.
तब्बल 3 महिने त्यांनी कुटुंबाला उपचारांबाबत पूर्णपणे अंधारात ठेवले होते. आईने वारंवार जाब विचारल्यानंतर त्यांनी वडिलांना घरी आणले, मात्र तोपर्यंत त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. आयुषीनेच वडिलांची फीडिंग ट्यूब म्हणजेच अन्नाची नळी काढून घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा थेट आरोप आता मामाने केला आहे.


या संपूर्ण कटातील मुख्य आरोपी असलेला तिचा चुलत भाऊ बलराम अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मामाच्या नवीन आरोपानंतर पोलीस आता वडिलांच्या मृत्यूच्या अँगलनेही या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Nashik Traffic Update : नाशिक मध्यवर्ती वाहतुकीत आज बदल; कोणते मार्ग असणार बंद ? जाणून घ्या

Nashik Traffic Update : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे (Sahityaratna Anna Bhau Sathe) यांची आज जयंती आहे. त्या निमित्ताने आज, शनिवारी (दि.१) शहरात

Bhai Jagtap : AI-जनरेटेड व्हिडिओ प्रकरणी काँग्रेस नेते भाई जगताप यांच्याविरोधात गुन्हा; महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई: दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने कथित AI-जनरेटेड बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित

Girl Apologizes To PM Modi : "मी फक्त १५ वर्षांची आहे, मला माफ करा": पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मुलीचा माफीनामा; व्हिडिओ व्हायरल!

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या एका आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात चुकीची भाषा

Salman Khan and Sanjay Dutt : सलमान खानची संजय दत्तसाठी भावुक पोस्ट; मिठी मारतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले...

मुंबई : बॉलिवूडमध्ये मैत्रीची उदाहरणे दिली जातात, तेव्हा सलमान खान (Salman Khan) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांचे नाव सर्वात वर

Jammu Kashmir Terror Attack : धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; एकाचा मृत्यू

Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी स्थलांतरित मजुरांवर गोळीबार (Terror Attack) केल्याची

Asmita Dey : सायकल दुरुस्ती करणाऱ्या वडिलांची मुलगी ठरली 'सुवर्णकन्या'; अस्मिता डेने राष्ट्रकुल स्पर्धेत रचला इतिहास

Commonwealth Games 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 भारताच्या अस्मिता डे (Asita Dey) हिने ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकत देशाचे नाव