PM Narendra Modi : भारत केवळ बाजारपेठ नाही तर जागतिक विकासाचे लॉन्चपॅड : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भारत हा केवळ मोठी बाजारपेठ नसून जागतिक विकासाचे "लॉन्चपॅड" बनल्याचे ठामपणे सांगितले. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या उपस्थितीत ऑकलंड येथे दोन्ही देशांतील प्रमुख उद्योगपती आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) संबोधित करताना त्यांनी भारत-न्यूझीलंड आर्थिक सहकार्याला नवी दिशा देण्याचे आवाहन केले. मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, सेवा आणि कुशल मनुष्यबळाच्या देवाणघेवाणीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


मोदी (PM Narendra Modi) म्हणाले की, भारत आणि न्यूझीलंड हे लोकशाही, कायद्याचे राज्य, विविधतेचा आदर आणि शाश्वत विकासाच्या समान मूल्यांनी जोडलेले आहेत. या सामायिक मूल्यांच्या बळावर दोन्ही देशांतील आर्थिक भागीदारी अधिक मजबूत होईल. अवघ्या नऊ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत मुक्त व्यापार करार पूर्ण होणे ही द्विपक्षीय संबंधांतील ऐतिहासिक कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले. वर्ष २०३० पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून सात अब्ज न्यूझीलंड डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.



न्यूझीलंडने पुढील १५ वर्षांत भारतात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची बांधिलकी जाहीर केल्याचे सांगताना मोदी यांनी ही केवळ आर्थिक गुंतवणूक नसून भारताच्या विकास प्रवासातील भागीदारी असल्याचे स्पष्ट केले. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असून वाढता मध्यमवर्ग, डिजिटल क्रांती, आधुनिक पायाभूत सुविधा, कुशल युवा मनुष्यबळ आणि सातत्यपूर्ण आर्थिक सुधारणा यामुळे गुंतवणूकदारांसाठी मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. धोरणात्मक स्थैर्य, राजकीय स्थिरता आणि सातत्यपूर्ण विकासामुळे भारत जागतिक आर्थिक वाढीचे महत्त्वाचे केंद्र बनल्याचे त्यांनी सांगितले. (PM Narendra Modi)


उत्पादन आधारित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करताना त्यांनी अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योगासह १४ क्षेत्रांसाठी सुमारे २० अब्ज डॉलरचे प्रोत्साहन उपलब्ध असल्याचे सांगितले. न्यूझीलंडमधील कंपन्यांनी भारताच्या उत्पादन क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. भारतातील विमानतळ, प्रादेशिक हवाई संपर्क, एअर कार्गो आणि पर्यटन क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून भारत जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनल्याचे त्यांनी नमूद केले. दोन्ही देशांदरम्यान कार्गो कॉरिडॉर, थेट हवाई संपर्क आणि संयुक्त पर्यटन पॅकेज विकसित करण्याची सूचनाही त्यांनी केली. (PM Narendra Modi)



फिनटेक क्षेत्रात भारत जगात आघाडीवर असून जगातील जवळपास ५० टक्के रिअल-टाइम डिजिटल व्यवहार भारतात होतात, असे मोदी यांनी सांगितले. अंतराळ क्षेत्र खासगी गुंतवणुकीसाठी खुले केल्यानंतर देशात ४०० हून अधिक स्पेस स्टार्टअप कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. मुक्त व्यापार करारामध्ये माओरी समुदायाच्या उद्योगांनाही विशेष स्थान देण्यात आल्याचे सांगून भारत आणि न्यूझीलंड यांनी समावेशक आणि शाश्वत व्यापाराचे नवे मॉडेल विकसित करावे, असे त्यांनी आवाहन केले. तसेच दोन्ही देशांच्या उद्योगजगताने महत्त्वाकांक्षी व्यापार आराखडा तयार करून किमान पाच संयुक्त प्रकल्पांची निवड करावी आणि त्यासाठी प्रभावी आढावा यंत्रणा उभारावी, असेही त्यांनी (PM Narendra Modi) सुचविले.




Comments
Add Comment

Justice Yashwant Varma : न्या. यशवंत वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी

नवी दिल्ली : न्यायिक उत्तरदायित्व आणि सुधारणांसाठी अभियान (सीजेएआर) यांनी अलाहाबाद हायकोर्टाचे माजी

Ladakh Viral Incident : लडाखमधील वादावर २५ वर्षीय महिलेची माफी; “माझे बोलणे चुकीचे होते, लष्कराचा कायम आदर आहे”

लडाख : लडाखमधील एका रस्ता नाकेबंदी

Narayana Murthy : नारायण मूर्ती यांनी आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी सुद्धा मूर्तींसह दिली व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट

इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी आंध्र प्रदेशातील तिरुमला

Vande Bharat : चिनाब रेल्वे पुलावर वंदे भारतचा वेग वाढला; ताशी जवळपास 100 किमी वेगाने धावली ट्रेन

रियासी : जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलावरून

Headmistress murder case : झटपट श्रीमंत होण्याचा मोह, यूट्यूबवरील सर्च अन् मुख्याध्यापिकेची २७ वार करून निर्घृण हत्या; १० वीच्या विद्यार्थ्यांचा भयानक कट

हैदराबाद : तेलंगणातील नलगोंडा (Telangana News) जिल्ह्यात एका ४८ वर्षीय महिला मुख्याध्यापिकेच्या झालेल्या निर्घृण

MQ-9 Drones : इराण युद्धात MQ-9 ड्रोनचे नुकसान झाले तरी भारताने अमेरिकेसोबत अब्जावधींचा करार का केला? जाणून घ्या महत्त्वपूर्ण कारणे

नवी दिल्ली: इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अद्याप थांबलेला नाही. या संघर्षात अमेरिकेच्या अत्यंत प्रभावी