BMC : मुंबईतील दुघर्टनांवर चर्चा, पण उबाठाचे रामाच्या नावाने राजकारण

सभागृहात मुंबईतील दुघर्टनांवर बोलण्याऐवजी रामाच्या नावाच्या घोषणा देत घातला गोंधळ


मुंबई : मुंबईत पावसाळ्यातील (Mumbai Rains) दुघर्टनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जिवितांचे रक्षण करण्यासाठी महापालिकेकडून युध्दपातळीवर सर्व आवश्यक व आपत्कालिन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी बोलवण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये उबाठाने (UBT) रामाच्या नावाने राजकारण करायला सुरुवात केली. आजवर रामाचे नाव न घेणाऱ्या उबाठाने सभागृहात आल्यापासून ते पुढे जय श्री राम... राम मंदिरकें चोरोंको, जुते मारो सालोंको अशा घोषणा देत मुंबईकरांच्या जिवनाशी निगडीत मुद्दयाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मागील २५ वर्षे सत्ता भोगणाऱ्या उबाठाने मुंबईचे वाट लावली असून त्यांना आता त्यावरही उपाययोजना सुचवण्यासाठी त्यावर राजकारण करण्यात अधिक स्वारस्य असल्याचे दिसून आले.



मुंबई महापालिकेत मनसे गटनेते यशवंत किल्लेदार, काँग्रेसचे अश्रफ आझमी, उबाठाच्या श्रध्दा जाधव आणि टी जगदिश यांच्या मागणीनुसार विशेष सभेचे आयोजन महापौर रितू तावडे (Mayor Ritu Tawde) यांनी केले होते. या विशेष सभेमध्ये उपस्थित राहिल्यानंतर उबाठाच्या नगरसेवकांनी जय श्री राम यांच्या नावाने घोषणा देण्यास सुुुरुवात केली. उबाठाच्या घोषणांनंतर भाजपच्या नगरसेवकांनीही जय श्री रामच्या नावाच्या घोषणा देण्यास सुरुवात केल्यानंतर सभागृहातील कामकाजाला वेगळेच वळण लागले. त्यामुळे या गोंधळात आयुक्तांच्या उपस्थित न राहण्याच्या मुद्दयावरून अधिक गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने अखेर महापालिका सभागृहात १० मिनिटाकरता सभा तहकूब करण्यात आले.


सभागृहात मुंबईत उद्भवणाऱ्या पावसाळ्यातील दुघर्टनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जिवितांचे रक्षण करण्यासाठी महापालिकेकडून युध्दपातळीवर सर्व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी या विशेष सभेचे आयोजन केलेले असल्याने यावर सर्व सदस्यांकडून साधक बाधक चर्चा होणे आणि उपाययोजना सुचवणे आवश्यक होते. पण उबाठाने या विषयाला भलतीकडे वळवून हा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न केला. उबाठाला मुंबईकरांच्या प्रश्नाबाबत चिंता नसून त्यांना राजकारणात अधिक स्वारस्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले. डोक्यावर भगव्या आणि पांढऱ्या टोप्या घालून त्यांनी रामाच्या नावाने घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे उबाठाला जिथे या मुद्दयावर सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याची संधी होती, तिथे उबाठाने रामाच्या नावाचा गजर करत सत्ताधारी पक्षाला यांच्या चुका दाखवून उपायोजना काय करायच्या याची संधी हातची घालवून दिली.

Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे