Ashadhi Wari 2026 : आता वारीत मोबाईल चार्जिंगचे टेन्शन विसरा; महाऊर्जाकडून वारकऱ्यांसाठी 'सोलर' दिलासा!

मुंबई : आषाढी वारी २०२६ (Ashadhi Wari 2026) मध्ये सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. वारीदरम्यान मोबाईलची बॅटरी संपण्याची चिंता आता वारकऱ्यांना करावी लागणार नाही. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) यांच्या माध्यमातून पालखी सोहळ्यात सहभागी दिंडींसाठी सौरऊर्जेवर आधारित मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमामुळे वारकऱ्यांना कुटुंबीयांशी सतत संपर्कात राहणे, आवश्यक माहितीची देवाणघेवाण करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मोबाईलचा सहज वापर करणे शक्य होणार आहे. (Ashadhi Wari 2026)


आषाढी वारीनिमित्त (Ashadhi Wari 2026) श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरकडे जाणाऱ्या दिंडींमध्ये २५ जुलै २०२६ पर्यंत सोलर मोबाईल चार्जर संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक आणि स्वच्छ ऊर्जेवर आधारित ही सुविधा वारकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे.



वारीचा प्रवास अनेक दिवसांचा आणि शेकडो किलोमीटरचा असल्याने मोबाईल चार्जिंग ही वारकऱ्यांसमोरची मोठी अडचण असते. यावर उपाय म्हणून महाऊर्जाने सौरऊर्जेवर चालणारे मोबाईल चार्जर उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे पारंपरिक वीजेवरील अवलंबित्व कमी होण्यासोबतच अक्षय ऊर्जेचा प्रभावी वापरही होत आहे. (Ashadhi Wari 2026)


राज्य शासनाच्या अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा संवर्धन धोरणाला चालना देणारा हा उपक्रम स्वच्छ, हरित आणि शाश्वत ऊर्जेचा संदेश देणारा ठरत आहे. वारकऱ्यांना प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच सौरऊर्जेबाबत जनजागृती करण्याचाही महत्त्वाचा उद्देश या उपक्रमामागे आहे. (Ashadhi Wari 2026)



महाऊर्जाने वारकऱ्यांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले असून, आध्यात्मिक वारीला आधुनिक तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जेची जोड देणारा हा उपक्रम यंदाच्या वारीचे विशेष आकर्षण ठरत आहे. (Ashadhi Wari 2026)

Comments
Add Comment

BMC News : मालाड धारवलीत अनधिकृत डेब्रीज टाकणाऱ्यांविरोधात एफआयआर; महापालिकेने कंबर कसली, आता यापुढे गय केली जाणार नाही!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने बांधकाम व पाडकामाचा रोडारोड्याची अनधिकृत विल्हेवाट

BMC News : मुंबईत स्मार्ट कृत्रिम टर्फ धोरणाची मागणी; महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी नगरसेवकाने केली सूचना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांचे मोकळे मैदान, सार्वजनिक शांतता आणि आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, 'कृत्रिम टर्फ'

Railways Act : रेल्वे कायदा, १९८९ मध्ये सुधारणा, विनातिकीट प्रवास आणि आरक्षित डब्यात प्रवेशावर वाढला दंड

मुंबई : रेल्वे कायदा, १९८९ मधील काही प्रमुख तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून, अनधिकृत प्रवास, आरक्षित

PoP ban : पीओपी बंदीवर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा, राज्य सरकारच्या भूमिकेवर न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : पर्यावरणस्नेही सण-उत्सवांना प्रोत्साहन देण्याच्या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)

Minister Gulabrao Patil : सिंधुदुर्गला मोठा दिलासा! वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेला गती; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे गुलाबराव पाटील यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या

Devendra Fadnavis : २०३० पर्यंत राज्यात ३०० किमी नवे मेट्रो मार्ग सुरू होणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रत्येक प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन मुंबई : "राज्यातील मुंबई, पुणे