पालकमंत्री नितेश राणेंचे उद्योगमंत्र्यांना निवेदन; २८ एकर शासकीय जमिनीवर उद्योग केंद्र उभारण्याची मागणी
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला नवी गती देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर हक्काचा रोजगार निर्माण करण्यासाठी वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील २८ एकर शासकीय जमिनीवर 'महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ' (MIDC) स्थापन करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी गुरुवारी विधानभवनातील दालनात उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सुपूर्द केले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांनी मेलबर्न येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. या ...
सिंधुदुर्ग जिल्हा निसर्गसंपन्न असून पर्यटन, कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मात्र, या क्षेत्रांमध्ये प्रगत असला तरी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने जिल्ह्यात अजूनही प्रचंड मोठी क्षमता दडलेली आहे आणि ती पूर्णपणे वापरली गेलेली नाही. वैभववाडीतील नाधवडे परिसराचा विचार केल्यास, तेथे २८ एकर शासकीय जमीन उपलब्ध आहे. तसेच आवश्यक पायाभूत सुविधा आणि भविष्यातील औद्योगिक विस्ताराची क्षमता लक्षात घेता, या ठिकाणी नवीन एमआयडीसी विकसित करणे अत्यंत गरजेचे आणि काळाची गरज असल्याचे पालकमंत्री नितेश राणे(Nitesh Rane) यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
अंतर्गत घडामोडींना वेग; उबाठा गटाचे आमदारही मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राच्या ...
मौजे नाधवडे येथील या शासकीय जागेवर एमआयडीसीची स्थापना झाल्यास परिसरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे. या औद्योगिक केंद्रामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी लाभण्यासह गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील सुशिक्षित आणि कुशल युवकांचे रोजगारासाठी मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये होणारे स्थलांतर रोखण्यासही यामुळे मोठी मदत होईल, असे मंत्री नितेश राणे म्हणाले.





