खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, औद्योगिक वसाहतीतील एका चेंबरमधून मोठ्या प्रमाणात रासायनिक गळती झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे रसायन नैसर्गिक ओढ्याद्वारे शेतजमिनीत आणि पुढे नदीच्या दिशेने वाहून गेल्याचा दावा करण्यात आल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मुंबई(Mumbai) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाचा जोर आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र, अद्यापही काही जिल्ह्यांत पावसाचा धोका ...
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून जाब विचारला. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करत लोटे औद्योगिक वसाहतीतील पोलिस दूरक्षेत्र कार्यालयात लेखी तक्रारही दाखल करण्यात आली. या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्राथमिक कारवाई करत सुप्रिया लाइफ सायन्स, स्पॅक कंपनी, विनंती ग्रो, अक्वीला कंपनी, लक्ष्मी ऑरगॅनिक आणि एसएमडी स्पेशालिटी या सहा कारखान्यांना उत्पादनबंदीच्या नोटिसा बजावल्या आहेत. या कारखान्यांमधून प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांची तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई : व्हॉट्सअॅपने मुंबईत आयोजित वार्षिक बिझनेस समिट २०२६मध्ये व्यवसायांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करत ‘मेटा बिजनेस एजंट एआय’ सादर केले. या नव्या ...
कांचन चाळके (माजी सैनिक), शीतल जाधव आणि संजना घाग या सोनगावातील महिला ग्रामस्थांनी प्रदूषणामुळे परिसरातील पर्यावरण, शेती आणि नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप करत जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी लोटे औद्योगिक वसाहतीतील पोलिस दूरक्षेत्र कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर केवळ नोटिसा देऊन न थांबता त्यांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.
मुंबई : मुसळधार पावसामुळे लोणावळा–कर्जत घाट विभागात झालेल्या भीषण भूस्खलनाचा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. ६ जुलै रोजी झालेल्या ...
लोटे एमआयडीसीतील प्रदूषण प्रश्न यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी प्रशासनाने बजावलेल्या उत्पादन बंदीच्या नोटीसांची प्रभावी अंमलबजावणी होते का व दोषींवर पुढे कोणती कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष आहे.