मुंबई: मुंबईतील वडाळा (Wadala)(पूर्व) परिसरात मंगळवारी इमारतीचा पहिला मजला कोसळल्याची घटना घडली. शांतीनगर येथील विद्यानिकेतन कॉलेजच्या मागे असलेल्या ...
खेड तालुक्यातील राजगुरुनगर–भीमाशंकर मार्गावरील गुंडाळवाडी येथील पुलावरून पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने अनेक वाहने मार्गातच अडकली असून पुढील प्रवास अशक्य झाला आहे.
दुसरीकडे, आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकरकडे जाणारा मार्गही सकाळपासून घोडेगाव येथे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भीमाशंकरकडे जाणारे दोन्ही प्रमुख रस्ते बंद झाल्याने परिसराचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला आहे. (Heavy Rain Maharashtra)
- भाजप आमदार राम कदमांचा विधानसभेत दावा; तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश मुंबई : "ज्या आईने मला जन्म दिला, तिचे नुकतेच १२ ...
सततच्या पावसामुळे परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी तसेच पर्यटकांनी अत्यावश्यक कामाशिवाय भीमाशंकरकडे प्रवास करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.