Ashish Shelar : रिफायनरी किंवा अणुऊर्जा प्रकल्प कातळशिल्पांच्या आड येणार नाहीत!

- मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही; 'एआय'च्या माध्यमातून इतिहासपूर्व जीवनशैलीची पुनर्निर्मिती


मुंबई : मानवी उत्क्रांतीच्या आणि इतिहासपूर्व काळाच्या इतिहासाचे अत्यंत महत्त्वाचे पुरावे असलेल्या कोकणातील ऐतिहासिक कातळशिल्पांचे पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील रिफायनरी आणि अणुऊर्जा प्रकल्पांसारख्या मोठ्या विकास प्रकल्पांचे नियोजन केले जाईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. भारतीय पुरातत्त्व खाते आणि राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोकणात अशा प्रकारचा कोणताही प्रकल्प होणार नाही आणि या ऐतिहासिक वारशाला कोणताही धोका पोहोचणार नाही, असे स्पष्ट करतानाच, कातळशिल्पांच्या परिसराचा विकास व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.



विधानसभेत आमदार विठ्ठल लंघे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे कोकणातील कातळशिल्पांच्या दुरवस्थेचा आणि विकास प्रकल्पांमुळे निर्माण झालेल्या धोक्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, विक्रांत पाचपुते आणि नाना पटोले यांनी सहभाग घेत कातळशिल्पांच्या जतनासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री शेलार म्हणाले की, कोकणातील रत्नागिरी विभागातील सुमारे ३०० किलोमीटर लांब आणि २५ किलोमीटर रुंद क्षेत्रामध्ये २ हजारपेक्षा जास्त कातळशिल्पे आणि १५० हून अधिक कातळशिल्प स्थळे सापडली आहेत. या अमूल्य वारशाचे सूक्ष्मदृष्टीने आणि सर्व ऋतूंमध्ये दृकश्राव्य चित्रीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ८ एप्रिल २०२६ रोजीच्या शासननिर्णयान्वये, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयामार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट बनवण्यासाठी १४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून हा निधी उपलब्ध झाला आहे. (Ashish Shelar)


आंतरराष्ट्रीय बाजाराचे सर्वेक्षण करून या माहितीपटाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत सुरुवातीला ४५ मिनिटांचा एक उच्च दर्जाचा सिनेमॅटिक माहितीपट तयार केला जाईल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून इतिहासपूर्व काळातील मानवी जीवनशैलीची दृश्य स्वरूपात पुनर्निर्मिती केली जाणार आहे. यासोबतच, युनेस्कोच्या तात्पुरत्या जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट असलेल्या ९ स्थळांवर व त्यांच्या बफर क्षेत्रातील स्थळांवर स्वतंत्र ८ मिनिटांचे लघु माहितीपट आणि या संपूर्ण प्रक्रियेचे दस्तऐवजीकरण करणारा एक 'बिहाईंड द सीन्स' माहितीपटही बनवला जाईल. (Ashish Shelar)



डिजिटल प्रसारासाठी 'कंटेंट बँक' :


या चित्रीकरणाचे सर्व रॉ फुटेज, ड्रोनद्वारे केलेले हवाई चित्रीकरण आणि उच्च दर्जाची छायाचित्रे राज्य शासनाच्या संचालनालयाच्या ताब्यात राहतील. या दृकश्राव्य सामग्रीच्या आधारे समाजमाध्यमांसाठी (सोशल मीडिया) विशेष इन्फोग्राफिक्स आणि डिजिटल प्रसारासाठी आवश्यक 'कंटेंट बँक' विकसित केली जाणार आहे. कोकणात पर्यटनाला चालना देण्यासाठी कातळशिल्प परिसराचा विकास आणि सेवासुविधा उपलब्ध करून देणारा कृती आराखडा तयार झाला असून, त्यानुसार संरक्षण भिंती उभारणे व अन्य कामे सुरू झाली आहेत. ही कातळशिल्पे ज्या खासगी जमीन मालकांच्या जागेत आहेत, त्यांनाही पर्यटन विकासाच्या माध्यमातून आर्थिक फायदा होईल, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले असल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी नमूद केले. (Ashish Shelar)

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे