Ahmedabad Blast : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात मोठा निर्णय; ३८ दोषींची फाशी, ११ जणांची जन्मठेप उच्च न्यायालयाकडून कायम

Ahmedabad Blast : २००८ मधील अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट (Ahmedabad Blast) प्रकरणात गुजरात उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत विशेष न्यायालयाने २०२२ मध्ये सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायालयाने ३८ दोषींना सुनावलेली फाशीची शिक्षा आणि ११ दोषींची जन्मठेप कायम ठेवत दोषींच्या सर्व अपील याचिका फेटाळून लावल्या.


या प्रकरणाची सुनावणी विशेष खंडपीठासमोर झाली. मार्च २०२५ पासून नियमित सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. अखेर आज निकाल जाहीर करत विशेष न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. (Ahmedabad Serial Blasts)



न्यायालयाने पीडित कुटुंबियांनाही दिलासा देत बॉम्बस्फोटात मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. (Gujarat High Court)


यापूर्वी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी अहमदाबादच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणात ३८ दोषींना फाशी आणि ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. भारतीय कायद्यानुसार, कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतरच अंमलात येऊ शकते. त्यानुसार हे प्रकरण गुजरात उच्च न्यायालयात प्रलंबित होते. (Ahmedabad serial blasts verdict)



उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे २००८ मधील भीषण साखळी बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना तब्बल १८ वर्षांनंतर न्याय मिळाल्याचे मानले जात आहे.


Comments
Add Comment

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर