इंद्रायणीच्या पुरामुळे आळंदीत वारकऱ्यांची गैरसोय; मुंबई डबेवाले करणार भोजन व निवासाची व्यवस्था

Mumbai  : खेड, मावळ, पिंपरी-चिंचवड आणि लोणावळा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे. या पुराचा फटका संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झालेल्या लाखो वारकऱ्यांना बसला असून, शहरातील अनेक भाग जलमय झाल्याने वारकऱ्यांच्या निवास, भोजन आणि इतर मूलभूत सुविधांवर परिणाम झाला आहे.



पुराच्या पाण्यामुळे शासन आणि प्रशासनाने उभारलेल्या अनेक सुविधा बाधित झाल्या असून वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार(Sumetra Pawar) यांनी वारकऱ्यांना सध्या आळंदी व देहूकडे येणे टाळण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वारकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन व प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.



या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत मुंबई डबेवाले कामगार व कार्यकारिणीने आळंदीतील धर्मशाळेत वारकऱ्यांच्या निवासासह भोजनाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष  उल्हासभाऊ मुके, मंडळ अध्यक्ष रामदास करवंदे, ट्रस्ट सचिव विनोद शेटे, सचिव  किरण गवांदे तसेच कार्यकारिणी सदस्यांच्या पुढाकारातून ही सेवा राबविण्यात येणार आहे.


"या नैसर्गिक संकटाच्या काळात मुंबई डबेवाले वारकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. वारकऱ्यांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," अशी ग्वाही मुंबई डबेवाले संघटनेचे प्रवक्ते  विष्णू काळडोके यांनी दिली.

Comments
Add Comment

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात

Heavy Rain in Mumbai Pune : पावसाचा कहर! मुंबई-ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्यात १२ जुलैपर्यंत शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी उद्या

Flood in Indrayani : इंद्रायणीला पूर; वारकऱ्यांसाठी सरकारचे महत्त्वाचे आवाहन! आळंदीत न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीकडे निघालेल्या वारकरी आणि भाविकांसाठी राज्य

TET Exam Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! चारही आरोपींना १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

भिवंडी : राज्यभरात गाजत असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात मोठी घडामोड झाली

Minister Shivendrasinhraje Bhosale : मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घटनास्थळी धाव; बोगद्याला कोणतीही हानी नाही

- सुरक्षिततेनंतरच वाहतूक सुरू होणार मुंबई : मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंक (Mumbai - Pune Missing Link) प्रकल्पाच्या एंट्री पॉईंटजवळ

Ashadhi Wari 2026 : मुसळधार पावसामुळे इंद्रायणीला महापूर; आळंदीकडे जाणारे चारही पूल पाण्याखाली

वारकऱ्यांना 'आहात तिथेच थांबण्याचे' उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आवाहन! पुणे : यंदाच्या आषाढी वारीच्या