Mumbai Rain Alert : गरज असेल तरच घराबाहेर पडा!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; दुपारनंतर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता




मुंबई : "गेल्या काही तासांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक भागांत गंभीर परिस्थिती ओढवलेली आहे. आज दुपारनंतर मुंबईसह किनारपट्टीच्या भागांत ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, पुढील काही तास झाडे कोलमडणे किंवा इतर दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी सजग राहावे आणि अत्यंत अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे किंवा प्रवास करणे पूर्णपणे टाळावे," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आज विधानसभेत केले.



हवामान विभागाने वर्तवलेली पावसाची स्थिती लक्षात घेऊन मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून, नोकरदारांसाठी 'वर्क फ्रॉम होम'ची विनंती करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. फडणवीस म्हणाले, "मुंबईत दरवर्षी संपूर्ण मान्सून हंगामात सरासरी ८०० झाडे पडतात. मात्र, काल ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे एकाच दिवसात तब्बल ३५० झाडे कोसळली आहेत. यावरून परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना येईल. विरोधकांनी उपस्थित केलेले मुद्दे नक्कीच गंभीर आहेत, पण हे निसर्गाचे विपरित रूप आहे. प्रशासन पूर्वतयारीपेक्षा अधिक वेगाने काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत आहे." (Mumbai Rain Alert)



मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर दरड कोसळल्याच्या घटनेचा संदर्भ देत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, "कनेक्टिंग रिंगपाशी दरड कोसळताच तात्काळ वाहतूक रोखून ती डायव्हर्ट करण्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी प्रवाशांना रस्ता बंद असल्याचे सांगण्यात आले असून, अडकलेल्या गाड्या आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी रस्ता खचून पाणी साठल्यामुळे लहान गाड्या अडकल्या आहेत, तिथे मदतकार्य सुरू आहे. आजची वादळी परिस्थिती पाहता तरुणांनी पावसात फिरणे, धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटनाला जाणे पूर्णपणे टाळावे", असे आवाहन देखील त्यांनी केले.



मानखुर्दमध्ये बेकायदेशीर इमारतीमुळे दुर्घटना



मानखुर्द येथे रविवारी घडलेल्या इमारत दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, "ती इमारत पूर्णपणे बेकायदेशीर होती. ती शेजारील झोपड्यांवर कोसळल्यामुळे निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, ही घटना वेदनादायी आहे. अशा संकटसमयी राजकारण बाजूला ठेवून संवेदनशीलतेने काम करावे लागेल. मृतांची आकडेवारी देऊन गेलेले प्राण परत येत नाहीत. आज दुपारनंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात मी स्वतः संपूर्ण महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेत असून सर्व यंत्रणांना 'अलर्ट मोड'वर ठेवले आहे. सध्या प्राथमिक निवेदन तयार असले, तरी अर्धवट माहिती देण्याऐवजी, उद्या (मंगळवारी) या संपूर्ण परिस्थितीवर आणि सरकारच्या उपाययोजनांवर मी सभागृहात सविस्तर निवेदन करेन", असे फडणवीस यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai heavy rain : मुंबईत अवघ्या सहा दिवसांत १० जणांचा मृत्यू; पाऊस, झाडे कोसळणे आणि घर दुर्घटनांनी वाढवली चिंता

मुंबई : यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईत पावसामुळे घडणाऱ्या दुर्घटनांचे प्रमाण वाढत असून, ३० जून ते ५ जुलै या अवघ्या

Kashedi landslide: मुसळधार पावसाचा फटका; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, प्रशासनाकडून बचावकार्य सुरू

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यासह अनेक भागांतील रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम

Mumbai rain news : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; खासगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचा सल्ला, सरकारी कार्यालये अर्धा दिवस सुरू राहणार

मुंबई : मुंबईत (Mumbai) सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे मार्ग ठप्प! दरड कोसळली, एक्स्प्रेस वेसह रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम

मुंबई : मुंबई, पुणे आणि लोणावळा (Lonavala) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (Expressway),

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा कहर; २४ तासांत पूर्व उपनगरात १६१.११ मिमी पावसाची नोंद

मुंबई : मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसाने (Heavy Rain) सोमवारी जोरदार हजेरी लावली असून, गेल्या २४ तासांत शहरात

Mankhurd Incident : मुंबई हादरली! मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) मानखुर्द (Mankhurd) परिसरात रविवारी (५ जुलै) रात्री एक अत्यंत दुर्दैवी दुर्घटना (Accident) घडली.