उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना दरड कोसळल्याचा फटका, धुळे–मुंबई एक्स्प्रेससह अनेक रेल्वे गाड्या रद्द

Train cancellations : मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. कर्जत–लोणावळा आग्नेय घाट विभागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका थेट उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना बसला असून, धुळे–मुंबई आणि मुंबई–धुळे या दोन्ही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऐनवेळी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागली.


मुसळधार पावसाने घाट विभागात पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. कर्जत–लोणावळा (Karjat–Lonavala) दरम्यानच्या आग्नेय घाट विभागात डोंगराचा मोठा भाग घसरून माती आणि दगड थेट रेल्वे रुळांवर आले. ही घटना समोर येताच मध्य रेल्वे प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता त्या मार्गावरील रेल्वे वाहतूक तातडीने थांबवलीय.



उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना फटका


या निर्णयाचा फटका उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना बसला आहे. धुळे, चाळीसगाव, पाचोरा तसेच जळगाव परिसरातून दररोज हजारो प्रवासी नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी मुंबईकडे प्रवास करतात. या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–धुळे एक्स्प्रेस क्रमांक ११०११ आणि धुळे–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस क्रमांक ११०१२ या दोन्ही गाड्या आज सोमवारी रद्द करण्यात आल्या आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)


अनेक प्रवासी नेहमीप्रमाणे रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. मात्र, तेथे गेल्यानंतरच गाडी रद्द झाल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली. काहींनी तातडीने एसटी बसचा पर्याय स्वीकारला, तर अनेकांनी खासगी वाहनांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बसस्थानके, खासगी ट्रॅव्हल्स आणि इतर प्रवासी वाहनांवरही मोठी गर्दी पाहायला मिळाली.



दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू


तर दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, रेल्वे रुळांची सखोल तपासणी केली जात आहे. मार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) सांगितले.


दरम्यान, केवळ धुळे एक्स्प्रेसच नव्हे तर अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवरही या घटनेचा परिणाम झाला आहे. काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या असून, अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध स्थानकांवरील प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.



रेल्वे गाडीच्या माहितीसाठी संकेतस्थळाळा भेट द्या


घाट विभागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिस्थितीवर मध्य रेल्वे प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. हवामानाचा अंदाज आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार आणखी काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल किंवा काही गाड्या रद्द करण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी आपल्या रेल्वे गाडीची अद्ययावत माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर, एनटीईएस ॲपवर (NTES App) किंवा रेल्वे हेल्पलाइनवर (Railway Helpline) तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने (Central Railway Administration) केले आहे.


Comments
Add Comment

Nashik Crime : 'ती' नव्हे तर फोनवरची व्यक्ती तृतीयपंथी निघाली, मॅट्रिमोनिअल ॲपवर डॉक्टरला11.86 लाखांचा गंडा, AI व्हॉईसच्या मदतीने...

Nashik Crime : नाशिकमध्ये मॅट्रिमोनिअल ॲपच्या माध्यमातून डॉक्टरची तब्बल ११ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा

Mumbai local train : मुंबई लोकलमध्ये धक्कादायक प्रकार; धावत्या ट्रेनबाहेर महिला लटकताना कॅमेऱ्यात कैद

Mumbai local : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर

Nanded Loha Child Case Pocso : नांदेड हादरले! चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded News) लोहा तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली

Loose Oil Ban Update : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी २०११ पासूनच, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण; व्यापारी संघटनांच्या मागण्या फेटाळल्या

मुंबई : सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील प्रतिबंध हा महाराष्ट्र शासनाने किंवा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २०२६

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Tarun Tejpal : शरण या, तुरुंगात जा आणि शिक्षा भोगायला सुरुवात करा; नंतर...

नवी दिल्ली :  'तहलका'चे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बलात्कार प्रकरणी