Train cancellations : मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. कर्जत–लोणावळा आग्नेय घाट विभागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचा फटका थेट उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना बसला असून, धुळे–मुंबई आणि मुंबई–धुळे या दोन्ही एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऐनवेळी पर्यायी प्रवासाची व्यवस्था करावी लागली.
मुसळधार पावसाने घाट विभागात पुन्हा एकदा रेल्वे वाहतुकीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. कर्जत–लोणावळा (Karjat–Lonavala) दरम्यानच्या आग्नेय घाट विभागात डोंगराचा मोठा भाग घसरून माती आणि दगड थेट रेल्वे रुळांवर आले. ही घटना समोर येताच मध्य रेल्वे प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता त्या मार्गावरील रेल्वे वाहतूक तातडीने थांबवलीय.
Nashik Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. आजही नाशिकसह अनेक जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. आज नाशिक जिल्ह्यासह रायगड, पुणे ...
उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना फटका
या निर्णयाचा फटका उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना बसला आहे. धुळे, चाळीसगाव, पाचोरा तसेच जळगाव परिसरातून दररोज हजारो प्रवासी नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैद्यकीय कारणांसाठी मुंबईकडे प्रवास करतात. या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–धुळे एक्स्प्रेस क्रमांक ११०११ आणि धुळे–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस क्रमांक ११०१२ या दोन्ही गाड्या आज सोमवारी रद्द करण्यात आल्या आहेत. (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus)
अनेक प्रवासी नेहमीप्रमाणे रेल्वे स्थानकावर पोहोचले होते. मात्र, तेथे गेल्यानंतरच गाडी रद्द झाल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली. काहींनी तातडीने एसटी बसचा पर्याय स्वीकारला, तर अनेकांनी खासगी वाहनांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बसस्थानके, खासगी ट्रॅव्हल्स आणि इतर प्रवासी वाहनांवरही मोठी गर्दी पाहायला मिळाली.
मुंबई : राज्यातील मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. भूस्खलन, ...
दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
तर दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, रेल्वे रुळांची सखोल तपासणी केली जात आहे. मार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) सांगितले.
दरम्यान, केवळ धुळे एक्स्प्रेसच नव्हे तर अनेक लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवरही या घटनेचा परिणाम झाला आहे. काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्या असून, अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे आणि उत्तर महाराष्ट्रातील विविध स्थानकांवरील प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे घडलेल्या एका धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणाऱ्या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले आहे. पतीची हत्या करून ...
रेल्वे गाडीच्या माहितीसाठी संकेतस्थळाळा भेट द्या
घाट विभागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असल्याने परिस्थितीवर मध्य रेल्वे प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आहे. हवामानाचा अंदाज आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार आणखी काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल किंवा काही गाड्या रद्द करण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी आपल्या रेल्वे गाडीची अद्ययावत माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर, एनटीईएस ॲपवर (NTES App) किंवा रेल्वे हेल्पलाइनवर (Railway Helpline) तपासूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने (Central Railway Administration) केले आहे.