नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन अत्याधुनिक युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे सामील होणार आहेत. या दोन्ही युद्धनौकांमुळे भारताची किनारी सुरक्षा, सागरी गस्त आणि पाणबुडीविरोधी क्षमता अधिक मजबूत होणार असून देशाच्या सागरी संरक्षणाला नवे बळ मिळणार आहे.
मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि पनवेल येथे सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार पाऊस आणि ताशी वेगाने वाहणाऱ्या ...
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते कोलकाता येथे 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस संशोधक' आणि 'आयएनएस द्रोणागिरी' या तीन युद्धनौकांचे राष्ट्राला समर्पण करण्यात आले होते. त्यानंतर आता 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण'(INS Malvan)ही नौदलात दाखल करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 'आयएनएस मालवण' ही अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट प्रकारातील युद्धनौका असून तिची निर्मिती कोचीन शिपयार्डमध्ये करण्यात आली आहे. ३० एप्रिल(April) २०१९ रोजी तिची ऑर्डर देण्यात आली होती, तर ३० नोव्हेंबर २०२३ रोजी जलावतरण झाले. ३१ मार्च २०२६ रोजी ही नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ८० मीटर लांब, ११.३६ मीटर रुंद आणि ११०० टन वजनाची ही नौका ट्रिपल जेट वॉटर प्रणालीमुळे २५ नॉट्स वेगाने धावू शकते. आधुनिक रडार, हल-माउंटेड सेन्सर्स, हलक्या वजनाचे टॉर्पेडो आणि पाणबुडीविरोधी रॉकेट्स ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची आणि आरोग्य संपन्न वारी या डिजिटल उपक्रमाची सुरुवात मुंबई : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील केबीपी ...
'आयएनएस महेंद्रगिरी' ही नीलगिरी क्लासमधील अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट असून तिची बांधणी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये करण्यात आली आहे. २८ जून २०२२ रोजी बांधकामाला सुरुवात झाली, तर १ सप्टेंबर २०२३ रोजी जलावतरण करण्यात आले. ३० एप्रिल २०२६ रोजी हे जहाज नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.'आयएनएस महेंद्रगिरी'मध्ये ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे, ७६ मिमी नौदल तोफ, वरुणास्त्र टॉर्पेडो प्रणाली, रॉकेट लाँचर्स तसेच ध्रुव किंवा सी-किंग हेलिकॉप्टर तैनात करण्याची क्षमता आहे. अत्याधुनिक रडार आणि सोनार प्रणालीमुळे शत्रूची जहाजे व पाणबुड्यांचा अचूक शोध घेण्याची क्षमता या युद्धनौकेला प्राप्त झाली आहे. या दोन्ही युद्धनौका नौदलात दाखल झाल्यानंतर भारताच्या सागरी संरक्षण व्यवस्थेला मोठे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.