Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन अत्याधुनिक युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे सामील होणार आहेत. या दोन्ही युद्धनौकांमुळे भारताची किनारी सुरक्षा, सागरी गस्त आणि पाणबुडीविरोधी क्षमता अधिक मजबूत होणार असून देशाच्या सागरी संरक्षणाला नवे बळ मिळणार आहे.



गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते कोलकाता येथे 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस संशोधक' आणि 'आयएनएस द्रोणागिरी' या तीन युद्धनौकांचे राष्ट्राला समर्पण करण्यात आले होते. त्यानंतर आता 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण'(INS Malvan)ही नौदलात दाखल करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 'आयएनएस मालवण' ही अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट प्रकारातील युद्धनौका असून तिची निर्मिती कोचीन शिपयार्डमध्ये करण्यात आली आहे. ३० एप्रिल(April) २०१९ रोजी तिची ऑर्डर देण्यात आली होती, तर ३० नोव्हेंबर २०२३ रोजी जलावतरण झाले. ३१ मार्च २०२६ रोजी ही नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ८० मीटर लांब, ११.३६ मीटर रुंद आणि ११०० टन वजनाची ही नौका ट्रिपल जेट वॉटर प्रणालीमुळे २५ नॉट्स वेगाने धावू शकते. आधुनिक रडार, हल-माउंटेड सेन्सर्स, हलक्या वजनाचे टॉर्पेडो आणि पाणबुडीविरोधी रॉकेट्स ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.



'आयएनएस महेंद्रगिरी' ही नीलगिरी क्लासमधील अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट असून तिची बांधणी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये करण्यात आली आहे. २८ जून २०२२ रोजी बांधकामाला सुरुवात झाली, तर १ सप्टेंबर २०२३ रोजी जलावतरण करण्यात आले. ३० एप्रिल २०२६ रोजी हे जहाज नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.'आयएनएस महेंद्रगिरी'मध्ये ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे, ७६ मिमी नौदल तोफ, वरुणास्त्र टॉर्पेडो प्रणाली, रॉकेट लाँचर्स तसेच ध्रुव किंवा सी-किंग हेलिकॉप्टर तैनात करण्याची क्षमता आहे. अत्याधुनिक रडार आणि सोनार प्रणालीमुळे शत्रूची जहाजे व पाणबुड्यांचा अचूक शोध घेण्याची क्षमता या युद्धनौकेला प्राप्त झाली आहे. या दोन्ही युद्धनौका नौदलात दाखल झाल्यानंतर भारताच्या सागरी संरक्षण व्यवस्थेला मोठे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र

Narendra Modi : 'सेमीकंडक्टरपासून अणुऊर्जेपर्यंत...'; जाणून घ्या पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशाला

Independence Day 2026 : तिरंगा, २१ तोफांची सलामी आणि ‘वंदे मातरम्’चा निनाद; लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाचा दिमाखदार सोहळा

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील ऐतिहासिक लाल

Independence Day 2026 : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google Doodleची खास कलाकृती; भारतीय वस्त्रकलेतून दिसली सांस्कृतिक विविधता

नवी दिल्ली : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने आपल्या होमपेजवर खास आणि रंगीबेरंगी Doodle सादर करून

Independence Day 2026 : लाल किल्ल्यावर पंतप्रधान मोदी फडकवणार तिरंगा; स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली हाय अलर्टवर, वाहतुकीपासून सुरक्षेपर्यंत कडेकोट बंदोबस्त

नवी दिल्ली : देशभरात आज ८०वा स्वातंत्र्यदिन (Independence Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी