Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन अत्याधुनिक युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात अधिकृतपणे सामील होणार आहेत. या दोन्ही युद्धनौकांमुळे भारताची किनारी सुरक्षा, सागरी गस्त आणि पाणबुडीविरोधी क्षमता अधिक मजबूत होणार असून देशाच्या सागरी संरक्षणाला नवे बळ मिळणार आहे.



गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्या हस्ते कोलकाता येथे 'आयएनएस अग्रय', 'आयएनएस संशोधक' आणि 'आयएनएस द्रोणागिरी' या तीन युद्धनौकांचे राष्ट्राला समर्पण करण्यात आले होते. त्यानंतर आता 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण'(INS Malvan)ही नौदलात दाखल करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 'आयएनएस मालवण' ही अँटी-सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट प्रकारातील युद्धनौका असून तिची निर्मिती कोचीन शिपयार्डमध्ये करण्यात आली आहे. ३० एप्रिल(April) २०१९ रोजी तिची ऑर्डर देण्यात आली होती, तर ३० नोव्हेंबर २०२३ रोजी जलावतरण झाले. ३१ मार्च २०२६ रोजी ही नौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली. ८० मीटर लांब, ११.३६ मीटर रुंद आणि ११०० टन वजनाची ही नौका ट्रिपल जेट वॉटर प्रणालीमुळे २५ नॉट्स वेगाने धावू शकते. आधुनिक रडार, हल-माउंटेड सेन्सर्स, हलक्या वजनाचे टॉर्पेडो आणि पाणबुडीविरोधी रॉकेट्स ही तिची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.



'आयएनएस महेंद्रगिरी' ही नीलगिरी क्लासमधील अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट असून तिची बांधणी मुंबईतील माझगाव डॉकमध्ये करण्यात आली आहे. २८ जून २०२२ रोजी बांधकामाला सुरुवात झाली, तर १ सप्टेंबर २०२३ रोजी जलावतरण करण्यात आले. ३० एप्रिल २०२६ रोजी हे जहाज नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले.'आयएनएस महेंद्रगिरी'मध्ये ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे, ७६ मिमी नौदल तोफ, वरुणास्त्र टॉर्पेडो प्रणाली, रॉकेट लाँचर्स तसेच ध्रुव किंवा सी-किंग हेलिकॉप्टर तैनात करण्याची क्षमता आहे. अत्याधुनिक रडार आणि सोनार प्रणालीमुळे शत्रूची जहाजे व पाणबुड्यांचा अचूक शोध घेण्याची क्षमता या युद्धनौकेला प्राप्त झाली आहे. या दोन्ही युद्धनौका नौदलात दाखल झाल्यानंतर भारताच्या सागरी संरक्षण व्यवस्थेला मोठे बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

Comments
Add Comment

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात

Amit Shah : युवा पिढी आणि विद्यार्थी आमच्यासाठी महत्वाचे : अमित शाह

धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या कामाचंही कौतुक नवी दिल्ली : भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश खूप जास्त

Karnataka Politics : '२०२८ ची कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवणार नाही': माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बंगळुरु : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी निवडणूक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Assam Factory Blast : आसाममधील रॉड मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात भीषण स्फोट; ४ कामगारांचा मृत्यू

दिसपुर : आसाममधील कछार जिल्ह्यात रविवारी सकाळी रॉड उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान चार

Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी

Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत

Kargil Vijay Diwas : कारगिलपासून ऑपरेशन सिंदूरपर्यंत! भारतीय लष्कराच्या 'या' १० मोहिमांनी जगाला दाखवली ताकद

ऑपरेशन विजय (1999) (Operation Vijay) कारगिल युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावत भारताने २६ जुलै १९९९ रोजी विजय