Prakash Abitkar : वारीत अत्यावश्यक रुग्णांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा!

भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची आणि आरोग्य संपन्न वारी या डिजिटल उपक्रमाची सुरुवात


मुंबई : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात वारकरी भाविकांना पालखी मार्ग व मुक्कामस्थळी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.यंदाच्या वारीत प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स आणि तातडीच्या आरोग्य सेवांचे मजबूत जाळेही कार्यरत राहणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर(Prakash Aabitkat) यांनी दिली. बैठकीच्या प्रारंभी आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी वारीसाठी आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वसमावेशक नियोजनाची माहिती दिली.



यंदाच्या वारीत प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्स(Bike Ambulance) आणि तातडीच्या आरोग्य सेवांचे मजबूत जाळेही कार्यरत राहणार आहे.भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची आणि आरोग्य संपन्न वारी ' या डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून पालखी मार्गावरील वारकरी भाविकांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक आरोग्य कर्मचारी व आशा सेविकेमार्फत आवश्यक आरोग्य माहिती आणि सेवा भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येईल. तसेच वारकरी घरातून वारीसाठी निघाल्यापासून ते सुखरूप घरी परतेपर्यंत आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे व्यापक नियोजन आरोग्य विभागाने केले असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत, असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले.



बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, तसेच पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील प्रशासन व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष व दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते. गंभीर रुग्णांना तातडीने विशेष रुग्णालयात हलविण्यासाठी एअरॲम्बुलन्स ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. याशिवाय, गर्दीच्या ठिकाणी जलद पोहोचण्यासाठी बाईक ॲम्बुलन्स, आधुनिक जीवनरक्षक उपकरणांनी सज्ज रुग्णवाहिका आणि प्रशिक्षित वैद्यकीय पथके सतत कार्यरत राहणार आहेत.आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी बैठकीच्याप्रारंभी वारीसाठी आरोग्य विभागाने केलेल्या व्यापक नियोजनाची माहिती सादर केली. पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रे, तात्पुरती वैद्यकीय पथके, औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था तसेच मनुष्यबळाची उपलब्धता याबाबतची माहिती दिली.

Comments
Add Comment

Mankhurd : मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळला, पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

मुंबई : मुंबईत सतत पडत असलेल्या पावसामुळे मानखुर्दमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांतील

School - College Holidays : मोठी बातमी! मुंबई, ठाणे, पनवेलसह सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुटी; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि पनवेल येथे सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार

MLA Amit Satam : नौपाडा वृक्ष दुर्घटना प्रकरण तापले! एल विभागाच्या सहाय्यक आयुक्तांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आमदार अमित साटम यांची मागणी

मुंबई: कुर्ला पश्चिम येथील नौपाडा परिसरात घडलेल्या वृक्ष दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या हलगर्जीपणावर गंभीर आरोप

Tree Collapsed In Mumbai : मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्याचा तडाखा! १४२ झाड/फांदी पडण्याच्या घटना; २ दुर्दैवी मृत्यू

मुंबई: ताशी ७२ ते ७५ किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले

Mumbai Rain Update : मुंबईसह राज्यात पावसाचा कहर; अनेक भाग जलमय, धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ

मुंबई : मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढला असून पुढचे चार दिवस ही स्थिती अशीच राहण्याची शक्यता

Tree Collapse Accident In Mumbai : धक्कादायक! मुसळधार पावसात आणखी एक बळी; आरे कॉलनीत तरुणाचा दुर्दैवी अंत

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून दुर्घटनांची