BMC News :'झाडांच्या मुळांची सोनग्राफी करा'

धोकादायक झाडांचे तातडीने ऑडिट करा


शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांची मागणी


मुंबई : पुन्हा अशी दुर्घटना घडून कुणा विहानचा जीव त्यात जाऊ नये यासाठी मुंबईतील सर्व धोकादायक झाडांची त्रयस्थ संस्थेच्या तज्ञांमार्फत स्वतंत्र ऑडिट करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासोबतच केवळ 'बाह्य तपासणी' नको, तर मुळांची सोनोग्राफी करून तपासणी बंधनकारक करावी अशीही मागणी शायना एनसी यांनी केली आहे.


मागील ३० जून २०२६ रोजी चेंबूर (Chembur) येथील रोड नं. ११ येथे शालेय बसवर६०-७० वर्षे जुने पिंपळाचे झाड कोसळून त्यात ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दाखवलेल्या निष्काळजीपणावर शिवसेनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांनी आज बाळासाहेब भवन येथे पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली सविस्तर भूमिका मांडली.


पडलेले झाड हे १२ मे २०२६ रोजी संपूर्णपणे 'निरोगी' असल्याचा अहवाल पालिकेने दिलेला होता तर २९ मे रोजी झाडाची छाटणी करण्यात आली असल्याचे पालिकेने आपल्या अहवालात म्हंटले आहे. मात्र, रोड नं.११ वरील झाडांच्या मुळांना एप्रिल २०२५ आणि जानेवारी २०२६ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात रस्ता काँक्रीटीकरणाच्या कामामुळे मोठे नुकसान झाले असल्याचे पालिकेच्याच चौकशी अहवालातून समोर आले आहे. यामुळे या प्रकरणी जबाबदार धरून मुंबई महानगरपालिकेने ३ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.



खरे तर "झाड पडणे ही नैसर्गिक क्रिया आहे." पण त्यासाठी शहरात पडलेला मुसळधार पाऊस (Rain) हे फक्त निमित्त आहे. खरे कारण हे वृद्ध झालेली झाडे आणि त्यांच्या मुळाची व्यवस्थित निगा राखली न जाणे हेच आहे.,असे त्यांनी म्हटले.


या प्रकरणी शिवसेनेचे स्थानिक आमदार तुकाराम काते यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या भागातील झाडांची छाटणी करण्यासाठी आम्ही वारंवार मुंबई महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या, मात्र पालिका प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळेच त्याचे पर्यवसान एका निष्पाप मुलाचा जीव जाण्यात झाले असल्याचे काते यांनी सांगितले.


मुंबई (Mumbai) महानगरपालिकेचा (BMC) रस्ते विभाग आणि बाग विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव ही दुर्घटना घडण्याचे मुख्य कारण आहे. यासाठी संबंधितावर कठोर कारवाई करावी अशीही मागणी शायना यांनी केली आहे. त्यासोबतच धोकादायक झाडांच्या छाटणीबाबत नागरिकांच्या तक्रारींकडे 'दुर्लक्ष'न होता, ७२ तासांच्या आत त्यावर कार्यवाही व्हावी अशी यंत्रणा उभारण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे.



विहान श्रीवास्तव कुटुंबाला १० लाख द्या!


सोबतच मृत विहान श्रीवास्तव कुटुंबाला अडीच लाखांची केलेली मदत ही अतिशय तुटपुंजी मदत असून पालिकेने या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन किमान १० लाखांची मदत या कुटुंबाला द्यावी अशीही आग्रही मागणी शायना यांनी केली आहे.मुंबईकरांचे जीवांचे रक्षण करणे ही पालिकेची नैतिक जबाबदारी आहे. काही कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा जर एखाद्या निष्पाप व्यक्तीच्या जीवावर बेतणार असेल आणि त्याबद्दल संबंधितांवर कारवाई होणार नसेल तर ते चुकीचा संदेश देणारे ठरेल तसे झाल्यास याबाबत शिवसेना स्वतः रस्त्यावर उतरून पालिका प्रशासनाला जाब विचारेल असा इशारा शायना एन.सी यांनी दिला आहे. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर योग्य कारवाई व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Asiatic Society of Mumbai : एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या निवडणुकीत विनय सहस्रबुद्धे विजयी; 'एशियाटिक टुमॉरी' पॅनेलचा सर्व 19 जागांवर विजय

मुंबई : एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईच्या (Asiatic Society of Mumbai) बहुचर्चित आणि अनेक महिन्यांपासून रखडलेल्या निवडणुका अखेर

Mumbai Rain Update : मुंबईत जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत २४ तासांत सुमारे ७४ टक्के पाऊस

मागील चार दिवसांत ५८८ मिलीमीटर पावसाची नोंद समुद्राला मोठी भरती आणि संततधार पाऊस, तरीही मुंबईतील जनजीवन

Excessive Rainfall in Mumbai : IMD चा मुंबईला अतिवृष्टीचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे BMC चे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department - IMD) मुंबईसह (Mumbai) बृहन्मुंबई (Brihanmumbai) क्षेत्रासाठी आज, रविवार (५ जुलै)

Mumbai Rains : मुंबईत मुसळधार! रेल्वे, रस्ते जलमय, आजही रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : मुंबईसह (Mumbai) ठाणे, नवी मुंबई आणि पालघर परिसरात शनिवारी झालेल्या मुसळधार (Heavy) पावसामुळे संपूर्ण महामुंबईतील

Shaina NC : मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करा; शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांची मागणी

- चेंबूरमधील झाड पडून झालेल्या दुर्घटनेतील ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई

Devendra Fadnavis : गेमिंगमध्ये भारताची मोठी झेप! ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ साठी ‘इंडिया रायझिंग’चा ऐतिहासिक मार्ग खुला

- ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल –