Devendra Fadanvis : मुंबई, ठाणे, कोकणाला पावसाने झोडपले; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रशासनाला दिल्या 'या' सूचना

मुंबई : राज्यातील अनेक भागांसह मुंबईत सध्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागरिकांना अत्यंत सावध राहण्याचे आणि प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे (Alerts) काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसासह वादळ येण्याची दाट शक्यता मुख्यमंत्र्यांनी वर्तवली आहे. शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्याच्या सद्यस्थितीवर भाष्य केले.



६ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार


सध्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक तसेच पुण्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या अनुषंगाने प्रशासनाने कालपासूनच विविध सतर्कतेचे इशारे (Alerts) जारी केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व परिसरांमध्ये ६ जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ (NDRF) आणि एसडीआरएफ (SDRF) च्या तुकड्या सज्ज असून ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून दर तीन तासांनी हवामानाच्या अंदाजाचे एसएमएस (SMS) पाठवले जात आहेत. त्यामुळे अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि शक्यतो आपला प्रवास टाळावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.



मुंबई, पालघरमध्ये 'रेड अलर्ट'


दुसरीकडे, मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. हवामान विभागाने मुंबई आणि पालघर जिल्ह्यासाठी पावसाचा 'रेड अलर्ट' (Red Alert) दिला असून, या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. उपनगरांमध्ये, विशेषतः वसई, विरार आणि नालासोपारा येथे पावसाचा जोर अधिक असून, नालासोपाऱ्यात अनेक ठिकाणी कंबरेइतके पाणी साचल्याचे चित्र आहे. त्यातच दुपारी दोनच्या सुमारास समुद्राला भरती असल्याने, पावसाचा जोर असाच राहिल्यास सखल भागात पाणी साचून मुंबईकरांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.



मुंबईत शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर


मुसळधार पावसाच्या या इशाऱ्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शनिवारी एक मोठा निर्णय घेतला. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजानुसार आणि महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार, शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी मुंबईतील सर्व महानगरपालिका आणि संबंधित शाळांच्या दुपारच्या सत्राला सुट्टी जाहीर करण्यात आली. शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, सकाळच्या सत्रात शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवण्याची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर सोपवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड न करता प्रशासनाने हा सावधगिरीचा उपाय योजला आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : गेमिंगमध्ये भारताची मोठी झेप! ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ साठी ‘इंडिया रायझिंग’चा ऐतिहासिक मार्ग खुला

- ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल –

Devendra Fadnavis : राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पुन्हा सुरू करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

- सहकारात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव मुंबई : "महाराष्ट्र राज्य सहकारी संघाला १०७ वर्षांची उज्ज्वल परंपरा

Mumbai Rain : धक्कादायक! भांडूपमध्ये रस्ता खचून टेम्पो अन् झाड बघता बघता जमिनीच्या पोटात गायब

पुढचे काही तास मुसळधार पावसाची शक्यता Mumbai : मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे. परिणामी, शहराच्या काही

मागील सहा तासात पावसाने मुंबईला झोडपले... अनेक परिसर जलमय, वाहतुकीसाठी मार्ग केले बंद

मुंबई  : मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत असून उपनगरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ ते

Mumbai Hit And Run : मुंबईच्या जोगेश्वरीत भीषण अपघात; भरधाव टँकरच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील (Mumbai) जोगेश्वरी (Jogeshwari) पश्चिम परिसरात मध्यरात्री भीषण 'हिट अँड रन'ची (Hit And Run) घटना घडली. अमृत नगर येथील

Mumbai Tree Collapse Incidents : मुंबईतील झाडांच्या फांद्यांची छाटणी, तर पडझड होते कशी?

मुंबई : मुंबईत चेंबूर (Chembur) येथील झाडांच्या दुघर्टनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत असून आतापर्यंत एक लाखांहून