हिमाचलमध्ये पावसाचा कहर; किन्नौरमध्ये राष्ट्रीय महामार्ग-5 बंद

शिमला : हिमाचल प्रदेशात मान्सूनने जोरदार हजेरी लावताच विविध भागांत नैसर्गिक आपत्तींचे संकट गडद झाले आहे. जनजातीय जिल्हा किन्नौरमध्ये चोलिंग परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर अचानक आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यासोबत आलेल्या माती, दगड आणि चिखलामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.5 पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद झाला असून अनेक वाहने रस्त्यात अडकली आहेत.



पुराचा वेग इतका प्रचंड होता की महामार्गावरून जाणारी अनेक वाहने चिखल आणि ढिगाऱ्यात अडकून पडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्वजण सुरक्षित आहेत.घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने बचाव आणि मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू केले. किन्नौरचे उपायुक्त डॉ. अमित कुमार शर्मा यांनी घटनेची पुष्टी करत महामार्गावरील मलबा हटवण्यासाठी आणि अडकलेली वाहने बाहेर काढण्यासाठी जड यंत्रसामग्री तैनात करण्यात आल्याचे सांगितले. प्रशासनाचे पथक घटनास्थळी कार्यरत असून राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



दरम्यान, लाहौल-स्पीती जिल्ह्यातील जाहलमा नाल्यात आलेल्या पुरामुळे पूल पुन्हा एकदा बाधित झाला आहे. सीमारेषा रस्ते संघटनेने (BRO) उभारलेली तात्पुरती पुलियाही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने उदयपूर उपविभागासह पांगी खोऱ्याचा संपर्क तुटला आहे.या परिस्थितीत उदयपूर उपविभागातील शेनूर गावातील शांती देवी यांना छातीत संसर्ग आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कुल्लू येथे उपचारासाठी हलविण्यात येत होते. मात्र, रुग्णवाहिका (Ambulance) जाहलमा नाल्याजवळ पोहोचल्यावर नाला दुथडी भरून वाहत होता. अशावेळी बीआरओ आणि पोलिस जवानांनी बँको लोडरच्या सहाय्याने स्ट्रेचरसह रुग्णाला सुरक्षितपणे नाला पार करून दुसऱ्या बाजूला पोहोचवले. त्यानंतर त्यांना कुल्लू येथील प्रादेशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे.



बीआरओने नाल्यावर तात्पुरता पूल उभारून वाहतूक पुन्हा सुरू केली आहे. मे महिन्यात भूस्खलनामुळे जाहलमा पूल नुकसानग्रस्त झाला होता. सध्या नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून महिनाअखेरपर्यंत ते पूर्ण होईल, अशी माहिती स्थानिक आमदार अनुराधा राणा यांनी दिली.

Comments
Add Comment

Narendra Modi : अमरनाथ यात्रेनिमित्त पंतप्रधानांचे भाविकांना पत्र; सुरक्षित यात्रेसह 'पाच संकल्प' करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी

जम्मू-काश्मीर : सीआरपीएफचे वाहन उलटले; सहा जवान जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या

History of Death Penalty : भारतात फाशी देण्यात आलेली एकमेव महिला कोण? सिया गोयल प्रकरणानंतर पुन्हा इतिहास चर्चेत

नवी दिल्ली : पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agarwal Murder Case) मुख्य आरोपी सिया गोयलला फाशीची

India Japan relations : भारत-जपान दरम्यान महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या

नवी दिल्ली : भारत आणि जपान यांच्यात आज महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही

Indian Navy : एडनच्या आखातात भारतीय नौदलाची मोठी कारवाई; समुद्री चाच्यांचा हल्ला हाणून पाडला

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्रातील आपली ताकद सिद्ध करत मोठ्या समुद्री चाचेगिरीचा प्रयत्न हाणून

Delhi Police : दिल्लीत मोठ्या हल्ल्याचा कट उधळला, आयएसआयशी संबंधित ४ दहशतवाद्यांना अटक

नवी दिल्ली : एका मोठ्या आंतरराज्यीय कारवाईत, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानची(Pakistan) गुप्तचर संस्था