Pratap Sarnaik : एसटी प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने(ST)सवलतीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC)अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 'लाडकी बहीण' योजनेतील महिलांसह सर्व सवलतधारक प्रवाशांनी पुढील २८ दिवसांत स्मार्ट कार्ड काढणे आवश्यक असून, १ ऑगस्टपासून एनसीएमसी कार्डशिवाय सवलतीच्या दरात प्रवास करता येणार नाही.



एसटीचा प्रवास अधिक स्मार्ट, डिजिटल आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. एनसीएमसी कार्डमुळे तिकीट वितरणाची प्रक्रिया जलद होणार असून, रोख व्यवहारातही घट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.महामंडळाने कार्ड नोंदणी प्रक्रिया सुलभ केली असून, अर्ज केल्यानंतर सुमारे ३० दिवसांत लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर कार्ड ऑनलाइन रिचार्ज करून वापरता येणार असल्याने प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार आहेत.



महामंडळाच्या माहितीनुसार, सोलापूर शहर व जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे २ लाख ८९ हजार ३७१ प्रवाशांना एनसीएमसी स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध सवलत योजनांतील लाभार्थ्यांना या डिजिटल प्रणालीचा लाभ मिळणार आहे. परिवहन महामंडळ, ट्रॅव्हिक्स टेक्नॉलॉजी लिमिटेड आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबविण्यात येत असून, कॅशलेस आणि स्मार्ट प्रवासाच्या दिशेने एसटी महामंडळाचे हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Comments
Add Comment

Babasaheb Patil : ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना उद्या कर्जमाफीचा लाभ मिळणार

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील; पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खातेधारकांची यादी जाहीर होणार मुंबई (Mumbai):

Moshi Garbage Depot Accident : मोशी कचरा डेपो दुर्घटना : मृतांच्या वारसांना १० लाखांची आर्थिक मदत

पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत (Moshi Garbage Depot Accident) मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या

बिबट्याच्या दहशतीचा अखेर अंत! ११ बकऱ्या, एका वासराचा फडशा पाडणारा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद

- सलग दोन हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे गावकऱ्यांनी सोडला

PMFBY : महाराष्ट्रात सन २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्रात सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली असून,

Maharashtra Monsoon Update : महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम! राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ९५ टक्क्यांहून अधिक पाऊस

- पालघरमध्ये एका दिवसात तब्बल १८३ मिमी पावसाची नोंद मुंबई : राज्यात मान्सून (Maharashtra Monsoon Update) पुन्हा सक्रिय झाला असून

Heart-wrenching incident in Nagpur : शाळेत मधल्या सुट्टीत धावताना अचानक कोसळल्याने ८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

नागपूर: नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी शाळेत अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावणारी घटना