Nilesh Rane : स्मार्ट मीटरच्या तक्रारींबाबत अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांना खोटी माहिती

 आमदार निलेश राणे यांचा विधानसभेत आरोप; वाढीव बिलांबाबत ग्रामीण जनतेमध्ये तीव्र असंतोष


मुंबई : "स्मार्ट मीटरबाबत केवळ चार टक्के तक्रारी आल्याचे सांगत अधिकारी ऊर्जा राज्यमंत्र्यांना खोटी माहिती (ब्रीफिंग) देत आहेत. प्रत्यक्षात ग्रामीण भागात या मीटरविरोधात ५० टक्क्यांहून अधिक तक्रारी असून, जनतेमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, कोणत्याही क्षणी ग्रामीण भागातील संतप्त जनतेकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांना मार खाण्याची वेळ येईल," असे कुडाळ मालवण मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी शुक्रवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.(Nilesh Rane)



विधानसभेत स्मार्ट मीटरची सक्ती आणि वाढीव बिलांबाबत आमदार भिमराव तापकीर यांनी मांडलेल्या लक्षवेधीच्या चर्चेवर ते बोलत होते. निलेश राणे म्हणाले, "माझा मतदारसंघ हा पूर्णपणे ग्रामीण भागात येतो आणि सध्या प्रत्येक जिल्ह्यात स्मार्ट मीटरवरून मोठा संघर्ष सुरू आहे. अधिकारी मंत्रालयात बसलेल्या मंत्र्यांना सांगत आहेत की तक्रारीच नाहीत, पण हे धादांत खोटे आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागात महावितरणचे अधिकारी दुरुस्तीच्या नावाखाली ग्राहकांच्या घरी जातात आणि ग्राहकाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तिथे चोरट्या मार्गाने स्मार्ट मीटर बसवून मोकळे होतात. या मीटरमुळे बिलांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. आज ग्रामीण भागात तुम्ही नुसती शासकीय गाडी जरी घेऊन गेलात, तरी स्मार्ट मीटर विरोधात तक्रारी करणाऱ्या लोकांचे घोळके रस्त्यावर पाहायला मिळतील. माझ्या एकट्या मतदारसंघातून मी शेकडो तक्रारी आत्ता आणून देऊ शकतो. या वाढत्या जनक्षोभाचे निवारण करण्यासाठी सरकार नक्की काय उपाययोजना करणार आहे?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला.(Nilesh Rane)



आमदार नाना पटोले यांनीही निलेश राणे यांच्या सुरात सूर मिसळत खासगी कंत्राटदारांच्या मुजोरीवर बोट ठेवले. "मुख्यमंत्र्यांनी ही योजना जाहीर करताना स्मार्ट मीटर हे ऐच्छिक असतील असे सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हे मीटर अनिवार्य केले जात आहेत. मीटर बदलल्या क्षणापासून गरिबांची वीजबिले दुपटी-तिपटीने वाढत आहेत," असा आरोप पटोले यांनी केला.




तक्रारींचे प्रमाण नगण्य - राज्यमंत्री मेघना बोर्डिक


आमदार निलेश राणे आणि इतर सदस्यांच्या आरोपांना उत्तर देताना ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या, "स्मार्ट मीटरमुळे बिल वाढते हा एक अपप्रचार आणि गैरसमज आहे. केंद्रीय विद्युत अधिनियम २००३ नुसार ही प्रक्रिया राबवली जात असून राज्यात आतापर्यंत १ कोटी २३ लाख पोस्टपेड स्मार्ट मीटर बसवले आहेत. एकूण २ कोटी ग्राहकांपैकी केवळ ३ लाख तक्रारी आल्या असून हे प्रमाण नगण्य आहे," असे त्यांनी सांगितले. तसेच, पुणे परिमंडळात जून २०२६ पर्यंत सुमारे ९ लाख ८४ हजार मीटर बसवले असून प्राप्त झालेल्या ११ हजार ४१७ तक्रारींपैकी ४ हजार प्रकरणांची 'चेक मीटर' लावून प्रत्यक्ष जागेवर तपासणी केली असता केवळ ४ मीटरमध्ये तांत्रिक त्रुटी निघाल्याचा दावा मंत्र्यांनी केला. ग्राहकांच्या तक्रारींसाठी 'कन्झ्युमर रिलेशन मॅनेजमेंट' पोर्टल उपलब्ध असून वर्षभरात वीजपुरवठा आणि बिलिंग संदर्भातील ५३ लाख तक्रारींचे तात्काळ निवारण केल्याचे मंत्र्यांनी सांगितले.(Nilesh Rane)

Comments
Add Comment

India-France Trade : 'विकसित भारता'च्या प्रवासात भागीदार होण्यासाठी अर्थमंत्र्यांचे फ्रेंच कंपन्यांना आमंत्रण

भारत-फ्रान्सची सामरिक भागीदारी सातत्याने अधिक मजबूत होत आहे - सीतारामन नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला

CM Devendra Fadnavis : क्यूबेकसोबतच्या भागीदारीतून महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीची शक्यता; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

कॅनडातील क्यूबेक प्रांतांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसमवेत भेट मुंबई : महाराष्ट्र आणि कॅनडातील क्यूबेक

Ketan-Siya Case : लोहगड हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग; सिया गोयलचा व्हिडिओ व्हायरल

पुणे : लोहगड किल्ल्यावर केतन अगरवाल यांच्या कथित हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सिया गोयल आणि चेतन चौधरी

Tukaram Mundhe : आता दुधात भेसळ करणारे रडारवर

अन्न आणि औषध प्रशासनाकडून नवी नियमावली; आयुक्त तुकाराम मुंढे यांची घोषणा मुंबई (Mumbai) : हॉटेल व्यावसायिक, बेकरी आणि

Pratap Sarnaik : एसटी प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने(ST)सवलतीच्या योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी नॅशनल

Devendra Fadnavis : ॲट्रॉसिटी' कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमधील दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यस्तरीय दक्षता व संनियंत्रण समिती बैठक मुंबई: अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अर्थात 'ॲट्रॉसिटी'