मुंबई(Mumbai) : मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेससोबत करार मुंबई : हिंदुस्तान कोका-कोला(Cococola) बेव्हरेजेसने जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे ...
नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे.
वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाय काढण्यात येणा मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणामुळे ...
- बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक - 1916 पालघर हेल्पलाईन क्रमांक - 02525 297474, +91 82379 78873 ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक - 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827, ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष - 1800-222-108/8657887101 पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक - 02227458040/41/42





