महापालिकेतील अभियंत्यांच्या संघटनेने निलंबन मागे घेण्याची केली मागणी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : चेंबूर येथील झाड दुघर्टनेनंतर रस्ते विभागाच्या दोन अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करून तातडीने निलंबित करण्यात आल्यानंतर महापालिकेतील अभियंत्यांची संघटना अॅक्शन मोडवर आली आहे. या अभियंत्यांकडून खुलासा मागून न घेता निलंबित केल्यामुळे बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच तज्ज्ञांचा अहवाल येईपर्यंत त्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यातच मॅनहोलमधील एका व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणीही सहायक आयुक्तांसह चार अभियंत्यांना निलंबित करण्यात आल्याने मुंबईतील सर्वच कामगार संघटनांनी एकत्र येत प्रशासना विरोधात कामबंद आंदोलन पुकारण्याच्या हालचाली सुरु केल्याचे बोलले जात आहे.
मुंबई : राज्यात दमदार पावसाला सुरुवात झाली असून गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस सुरू आहे. विशेषतः मुंबईत चांगला पाऊस होत असून आज राज्यातील ...
मुंबईतील सलग दोन दुघर्टनांमध्ये एका सहायक आयुक्तांसह सहा अभियंते आणि एका वृक्ष अधिकारी यांना निलंबित केले. या निलंबन कारवाईनंतर अभियंत्यांच्या संघटनांच्या शिष्टमंडळाने महापालिका मुख्यालयात धाव घेत आयुक्तांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना आयुक्तांची भेट होवू शकली नाही. मात्र, चेंबूर येथील झाड दुघर्टनेनंतर रस्ते विभागाचे दुय्यम अभियंता आणि सहायक अभियंता यांना तात्काळ निलंबित केल्यानंतर बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने आयुक्तांना पत्र लिहून ही नाराजी व्यक्त करत त्या दोन्ही रस्ते अभियंत्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली. मागील पावसाळयापूर्वी कॉक्रीट रस्त्याचे कामाची देखभाल करणा-या पालिका अभियंत्यांना जबाबदार ठरवून त्यांच्या कडून कोणताही खुलासा न मागवता निलंबन करण्यात आले,याबाबत ही नाराजी व्यक्त केली. या पत्रांत असे नमुद केले आहे की, जोरदार हवा, मुळांनी माती सोडणे, मुळांचे कुजणे, झाडाचे अतिरिक्त वजन अथवा अयोग्य छाटणी अशा बार्बीमुळे मुसळधार पावसात झाडे पडतात. तसेच झाड धोकादायक झाले आहे की नाही त्याबाबत वृक्ष संगोपन तज्ञ (आरबोरिस्ट) सांगू शकतात. तसेच विषयाधिन झाड हे पिंपळाचे होते व ते खोडामधून उन्मळून पडले. त्यामूळे या दुर्देवी घटनेला पालिका अभियंत्यांना जबाबदार धरणे अनाकलनीय आहे,असे म्हटले आहे.
मुंबई : जून महिना जवळपास कोरडाच गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत १ जुलै रोजी ...
चेंबूर येथील रोड क्र. ११ वरील कॉक्रीटीकरणाचे काम झाडाच्या बुंध्यापासून २.५०मी पेक्षा जास्त अंतरावर करण्यात आले आहे व हे काम पूर्ण झाल्यानंतर मे ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत प्रचंड पाऊस मुंबईत झाला आहे. त्यामुळे याची पुर्ण चौकशी केल्याशिवाय व अशा दुर्घटना भविष्यात घडू नये म्हणून तज्ञांचा अहवाल येईपर्यंत पालिका अभियंते अरूण मुंडे (दुय्यम अभियंता) आणि योगेश पार्टे (सहाय्यक अभियंता) यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्यावी,अशी विंनती केली आहे.