चेस्टर-ले-स्ट्रीट : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळे वाया गेला आहे. मात्र, या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या भूमीवर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.
मुंबई : जून महिना जवळपास कोरडाच गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत १ जुलै रोजी ...
या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने २० षटकांत ७ बाद १८९ धावा उभारल्या. त्यानंतर सततच्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. इंग्लंडला फलंदाजीची संधीच मिळाली नाही.
फुटबॉल जगतात शिस्तीचे कडक धोरण: २०२६ च्या फिफा विश्वचषकात पंचांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यातच ...
श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम
या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आलेल्या श्रेयस अय्यरने संयम राखत ४७ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. त्याने १४४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत ६ चौकार आणि १ षटकार लगावला. लियाम डॉसनच्या गोलंदाजीवर एक धाव घेत त्याने आपले नववे टी-20 आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण केले. यासह त्याने एका नव्या विक्रमाला गवसणी दिली. यापूर्वी इंग्लंडमध्ये भारतीय कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या विराट कोहलीच्या (47 धावा) नावावर होती. आता श्रेयसने 68 धावांची खेळी करत हा विक्रम मोडीत काढला. विशेष म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही इंग्लंडमध्ये कर्णधार म्हणून टी-20 सामन्यात अर्धशतक करता आले नव्हते.
- ठाकरे गटाच्या पडझडीला संजय राऊतच जबाबदार मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या वेगवान घडामोडी आणि नेत्यांच्या पक्षांतराच्या ...
इंग्लंडमध्ये भारतीय कर्णधाराची सर्वोच्च टी-20 धावसंख्या :
68 धावा – श्रेयस अय्यर (चेस्टर-ले-स्ट्रीट, 2026)
47 धावा – विराट कोहली (कार्डिफ, 2018)
43 धावा – विराट कोहली (ब्रिस्टल, 2018)
31 धावा – रोहित शर्मा (बर्मिंगहॅम, 2022)
30 धावा – एमएस धोनी* (लॉर्ड्स, 2009)