Asiatic Library: एशियाटिक लायब्ररीच्या संवर्धनासाठी ५.६३ कोटींची कामे; जुलैअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

एशियाटिक लायब्ररीच्या जतनासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ५६३.३३ लाखांचा निधी मंजूर


मुंबई : राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या एशियाटिक लायब्ररी इमारतीच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने व्यापक दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सोमवारी या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला आणि कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.





या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ५६३.३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून एकूण १२ संवर्धन आणि दुरुस्तीची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे जुलै २०२६ अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.





यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले की, एशियाटिक लायब्ररी ही केवळ ग्रंथालयाची इमारत नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक इतिहासाचा महत्त्वाचा वारसा आहे. या ऐतिहासिक वास्तूचे मूळ स्वरूप कायम ठेवत आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.



या प्रकल्पांतर्गत ग्रंथालय संचालनालय, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आणि एशियाटिक सोसायटीच्या कार्यालयांमध्ये रंगकाम, गिलावा दुरुस्ती, छताची दुरुस्ती, लाकडी दरवाजे, खिडक्या आणि कपाटांचे संवर्धन, तसेच विविध नागरी दुरुस्तीची कामे केली जात आहेत. याशिवाय शौचालयांचे नूतनीकरण, कर्मचारी कक्षांची दुरुस्ती, जिने, वाचन कक्ष आणि संशोधन संस्थेच्या कक्षांमध्येही आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.



तळघरातील ग्रंथसंग्रह सुरक्षित ठेवण्यासाठी ओलावा नियंत्रण आणि संरचनात्मक मजबुतीकरणाची कामेही करण्यात येत आहेत. वारसा वास्तू संवर्धनाचे सर्व निकष पाळून कामे करण्यात यावीत आणि नागरिकांना कमीत कमी गैरसोय होईल, याची काळजी घेण्याच्या सूचनाही मंत्र्यांनी दिल्या.

 
Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : शेती, शेतरस्त्याच्या भांडणात आता ई-मेलवर मिळालेली नोटीस ग्राह्य

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; बाधित शेतकऱ्यांना मिळणार 'मोफत' पोलीस संरक्षण मुंबई : ग्रामीण

Devendra Fadnavis : नीती आयोगाच्या निर्देशांकांवर पुढील ४ वर्षांत परिणामकारक कामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Pavana Dam : पवना धरण ९३ टक्क्यांहून अधिक भरले; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मावळ : मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Ashadhi Wari Charan Seva : ‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; १४ जिल्ह्यांतील ४.९६ लाख वारकऱ्यांना थेट लाभ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा २४ जुलै रोजी समारोप; १४०

Maharashtra Cyber ​​Cell : महाराष्ट्र सायबर सेल कात टाकणार

- केंद्र सरकारच्या धर्तीवर 'हायटेक' रचना; सर्व यंत्रणा येणार एका छताखाली मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वेगाने

Nitesh Rane : चिपी विमानतळाला जलमार्गांनी जोडणार

मंत्री नितेश राणे यांची घोषणा; १५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू होणार मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्याचा