१० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या NHM कर्मचाऱ्यांना समकक्ष पदांवर नियुक्ती
मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली असून यासाठी वार्षिक १,१५३.६० कोटी रुपयांच्या खर्चालाही मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पाठपुराव्यानंतर हा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हाय-सिक्युरिटी प्लेट बंधनकारक; एजंटच्या आमिषाला बळी न पडण्याचे परिवहन मंत्री सरनाईक यांचे आवाहन मुंबई : राज्यात १ ...
शासन निर्णयानुसार, २५ जून २०२६ पर्यंत तांत्रिक खंड वगळता सलग १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना एकवेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदांवर नियुक्ती दिली जाणार आहे. पदांची समकक्षता निश्चित करताना कामाचे स्वरूप, जबाबदाऱ्या, शैक्षणिक पात्रता, सेवा नियम आणि वेतनश्रेणीचा विचार केला जाणार आहे.
या कर्मचाऱ्यांना समकक्ष पदाचे किमान मूलभूत वेतन, महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता मिळणार असून सध्याचे वेतनही संरक्षित राहणार आहे. मात्र, पदोन्नती, निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन किंवा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लागू असलेल्या रजाच त्यांना लागू राहतील.
- सचिन अहिरांमुळे वाढले एकनाथ शिंदेंचे बळ; कामगार वर्गाची मोठी ताकद महायुतीकडे मुंबई : उबाठा गटाचे उपनेते आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेच्या (शिंदे) ...
शासनाने स्पष्ट केले आहे की, ही अधिसंख्य पदे व्यक्तीसापेक्ष असतील. संबंधित कर्मचारी सेवा सोडल्यानंतर किंवा सेवानिवृत्त झाल्यानंतर ही पदे आपोआप रद्द होतील आणि त्यावर नव्याने नियुक्ती केली जाणार नाही.