BMC News : तलाव क्षेत्रात पावसाची गैरहजेरी; मुंबईकरांच्या चिंतेत वाढ

- आणखी पाच टक्के कपात पुढील आठवडयापासून ?


मुंबई (सचिन धानजी)


मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये अद्यापही पाण्याचा शिडकावा पडला नसून यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत अजुनही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे तलाव क्षेत्रात न पडणाऱ्या पावसामुळे आता मुंबईकरांना येत्या आठवड्यापासून पाच टक्के अधिकच्या पाणी कपातीला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ३० जुन पर्यंतच्या पावसावर पुढील कपातीचा निर्णय घेतला जाईल असे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार अद्यापही तलाव क्षेत्रात समाधानकार पावसाची हजेरी न लागल्याने मुंबईकरांना सध्याच्या दहा टक्के कपातीच्या तुलनेत अधिक पाच टक्के कपात वाढवली जावून १५ टक्क्यांपर्यंत कपात लागू केली जाण्याची दाट शक्यता आहे. (BMC News)


मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा,मध्य वैतरणा आणि भातसा या नगरबाह्य धरणांमध्ये अद्यापही पाऊस पडत नसून रविवारी सकाळपर्यंत अप्पर वैतरणा, तानसा परिसर कोरडा तर मोडकसागर, मध्य वैतरणा आणि भातसा क्षेत्रात ५ ते १८ मि.मी एवढाचा पाऊस पडला गेला. तर मुंबईतील विहारमध्ये ४५.१३ मि.मी आणि तुळशी तलाव क्षेत्रात २४.२६ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. (BMC News)



नगरबाह्य धरणांमधील मोडक सागर धरणामध्ये आतापर्यंत एकूण ३८ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली. तर सर्व धरणांमध्ये चार ते पाच मि.मी एवढ्याच एकूण पावसाची नोंद झाली आहे. तर विहारमधील एकूण पावसाची ११२ मि.मी आणि तुळशी तलाव क्षेत्रातील एकूण पावसाची १७९ मि.मी एवढी आहे. (BMC News)


मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमध्ये ६.९३ टक्के एवढा पाणी साठा असून मागील वर्षी याच कालावधीमध्ये ३९.५० टक्के एवढा पाणी साठा होता, तर त्याआधीच्या म्हणजे सन २०२४मध्ये याच कालावधीमध्ये ५.४३ टक्के एवढा पाणी साठा होता. मुंबईला दरवर्षी एकूण १४ लाख ४७ हजार ३५३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्यातुलनेत सोमवार २९ जून २०२६ पर्यंत पाण्याचा एकूण साठा हा १ लाख २७९ दशलक्ष लिटर एवढा आहे. (BMC News)



तलावातील पाणी साठा कमी झाल्याने भातसामधून १४७ एमसीए आणि वैतरणातून ९० एमसीए अशाप्रकारे २३७ एमसीए एवढा निभावणी साठ्यातील पाणी वापरण्यास परवानगी मिळावी आहे. त्यामुळे उपलब्ध साठा आणि निभावणी साठ्यामधील पाणी वापरले जात असून हा एकूण साठा आता दहा टक्के पाणी कपात केल्यामुळे १७ ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा आहे. मात्र, ३० जुनपर्यंतच्या पावसाचा आढावा घेवून पुढील पाणीकपातीचा संदर्भात आढावा बैठक घेवून निर्णय घेतला जाईल,असे महापालिका आयुक्त आश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे २९ जुन पर्यंत पावसाचा थेंबही तलाव क्षेत्रात पडत नसल्यामुळे कपात वाढवण्याशिवाय प्रशासनापुढे पर्याय नसून अजुन सध्याच्या दहा टक्के कपातीमध्ये अजुन पाच टक्के कपात वाढवण्याचा विचार प्रशासन करत आहे. एकूण १५ टक्क्यांच्या पुढे कपात लागू करण्यास मर्यादा असल्यामुळे यापेक्षा अधिक वाढ कपातीमध्ये केली जाणार नाही. कपात वाढवणे हे आवश्यक असले तरी प्रत्यक्षात अनेक शेवटच्या ठिकाणांवर आणि उंचावर पाणी योग्य दाबाने पोहोचले जाणार नाही आणि यामुळे समस्या अधिक वाढेल, याकरता पाच टक्के कपात वाढवण्याचा विचार प्रशासन करत असल्याची माहिती मिळत आहे. (BMC News)

Comments
Add Comment

Mantralaya Water : 'मंत्रालयातील पाणी पूर्णपणे सुरक्षित'; टाक्यांची स्वच्छता, वॉटर प्युरिफायर सर्व्हिसिंग पूर्ण, BMCचा अहवाल दिलासा देणारा

मुंबई : मंत्रालयातील पाणीपुरवठ्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनंतर सार्वजनिक बांधकाम

Monsoon Update : राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात अलर्ट

मुंबई(Mumbai) : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचे स्वरूप विस्कळीत राहिले होते. मात्र आता राज्यातील अनेक

Chandrashekar Bawankule : नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 महसूल विभागाच्या सेवा नियमांत ५० वर्षांनी बदल; मुख्यमंत्र्यांकडून प्रस्तावाला मान्यता मुंबई : महसूल

MIDC Maharashtra : वैभववाडी 'MIDC'ला मूर्त रूप, पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याचे मंत्री उदय सामंतांचे निर्देश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत मंत्रालयात बैठक मुंबई :

Mumbai Police : CJPच्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; ८ पोलीस ठाण्यांत ९०० हून अधिक आंदोलकांवर गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील CJP आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत शहरातील आठ वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

NITI Aayog Investment Index : नीती आयोगाच्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांकात महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी

५६.६ गुणांसह गुजरात पहिले; तामिळनाडूचा तिसरा क्रमांक मुंबई(Mumbai) : देशातील राज्यांमध्ये गुंतवणुकीला पोषक वातावरण,