Akanksha Chamola : गौरव खन्नापासून विभक्त होण्यामागचं कारण आकांक्षा चमोलाने पहिल्यांदाच सांगितलं; म्हणाली, मला....

Akanksha Chamola : टीव्ही अभिनेता गौरव खन्ना (Gaurav Khanna) आणि त्याची पत्नी आकांक्षा चमोला (Akanksha Chamola) यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 'लॉक अप २'च्या नव्या भागात आकांक्षाने त्यांच्या नात्यात दुरावा येण्यामागचं कारण प्रथमच स्पष्ट केलं. शोमध्ये श्रेया कालरा (Shreya Kalra) आणि सूफी मोतीवाला (Sufi Motiwala) यांच्याशी संवाद साधताना आकांक्षा म्हणाली की, लग्नाच्या सुरुवातीला तिला आई होण्याची इच्छा नव्हती. कालांतराने तिला आपण कधीच आई बनू इच्छित नसल्याची खात्री झाली. सुरुवातीला गौरव तिच्या निर्णयाशी सहमत होता, मात्र नंतर त्याची मुलं होण्याची इच्छा वाढली.



मला आई व्हायचं नाही


श्रेया कालराने आकांक्षाला विचारले की, भविष्यात तिला कधी मूल होण्याची इच्छा आहे का? यावर आकांक्षाने स्पष्टपणे उत्तर दिले, "कधीच नाही. माझ्या मनात आई होण्याची भावना नाही. मला जेव्हा जाणवलं की मी मातृत्वासाठी तयार नाही, तेव्हाच मी गौरवला याबद्दल स्पष्ट सांगितलं होतं. आकांक्षा पुढे म्हणाली, मला जेव्हा पूर्ण खात्री झाली की मला आई व्हायचं नाही, तेव्हा मी गौरवला स्पष्ट सांगितलं की मी हे करू शकत नाही. मी त्याला हेही सांगितलं होतं की, जर त्याला मूल हवं असेल, तर तो मला सोडू शकतो."


संवादादरम्यान आकांक्षाने पुढे सांगितले, मी त्यांची भूमिकाही समजू शकते, कारण अनेक नात्यांमध्ये हा मोठा मुद्दा ठरू शकतो. खरं सांगायचं तर, बहुतेक लोक लग्न करतात ते कुटुंब वाढवण्यासाठी आणि मुलं होण्यासाठी. त्यामुळे जर त्यांची मूल होण्याची इच्छा असेल, तर त्यात त्यांची काहीही चूक नाही. ती पुढे म्हणाली की, 'बिग बॉस'च्या काळात तिला गौरवला वडील होण्याची तीव्र इच्छा असल्याचं जाणवलं. मात्र स्वतःला मातृत्व स्वीकारायचं नसल्याने दोघांनी परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला.



आकांक्षाचा 'चाइल्ड-फ्री' आयुष्य जगण्याचा निर्णय


भविष्यात मूल दत्तक घेण्याच्या प्रश्नावरही आकांक्षाने स्पष्ट भूमिका मांडली. "मी जाणीवपूर्वक 'चाइल्ड-फ्री' आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे. मला कोणत्याही मुलाची जबाबदारी घ्यायची नाही. मला माझं आयुष्य माझ्या अटींवर आणि स्वतंत्रपणे जगायचं आहे," असं ती म्हणाली.


याआधी 'लॉक अप २'च्या ('Lock Upp 2') प्रीमियरमध्ये आकांक्षाने आपण आणि गौरव गेल्या वर्षभरापासून वेगळे राहत असल्याचं आणि परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं होतं. दोघांमध्ये कोणताही वाद किंवा कटुता नसून, भविष्याबाबतची वेगवेगळी भूमिका हेच त्यांच्या विभक्त होण्यामागचं मुख्य कारण असल्याचं तिने स्पष्ट केलं.

Comments
Add Comment

Actor Satendra Soni : 'लापता लेडीज' फेम सत्येंद्र सोनीचा धक्कादायक आरोप! मानधन मागितल्यावर मारहाण, हॉटेलमधून...

मुंबई : 'लापता लेडीज' चित्रपटातील 'छोटू' या भूमिकेमुळे चर्चेत आलेला अभिनेता सत्येंद्र सोनी (Actor Satendra Soni) सध्या एका

'Mirzapur: The Movie' : ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा टीझर इंटरनेटवर सुपरहिट! रिलीज होताच YouTube ट्रेंडिंगमध्ये #1

मुंबई : अखेर चाहत्यांची बहुप्रतीक्षित प्रतीक्षा संपली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’चा दमदार टीझर प्रदर्शित होताच

Rohit Shetty : रोहित शेट्टींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! २० कोटींच्या खंडणीची मागणी; बिश्नोई गँगचं कनेक्शन तपासात

मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Nivedita & Ashok Saraf : अशोक सराफांना लग्न करायचंच नव्हतं; सचिन पिळगांवकरांनी जमवली जोडी; सराफ जोडीच्या लग्नाची ही कहाणी अनेकांना माहिती नाही

Ashok Saraf & Nivedita Saraf Anniversary : मराठी कलाविश्वात अशोक सराफ आणि निवेदिता सराफ ही लोकप्रिय जोडी आहे. या दोघांच्या लग्नाला आज ३७

Vithabai Narayangaonkar : जाणून घ्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्याविषयी काही रंजक गोष्टी

मुंबई : तमाशा विश्वातील अजरामर नाव : विठाबाई नारायणगावकर (Vithabai Narayangaonkar) यांना महाराष्ट्राच्या 'तमाशा सम्राज्ञी'

Lock Upp 2 : 'लॉकअप २'मध्ये रंगणार सेलिब्रिटींचा थरार! १५ स्पर्धकांची संपूर्ण यादी आली समोर

'Lock Upp 2' : लोकप्रिय रिअॅलिटी शो 'लॉकअप २ (Lock Upp) पुन्हा एकदा नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पहिल्या पर्वाला