Maharashtra Monsoon Update : राज्यात पुन्हा पावसाची दमदार एन्ट्री! २२ जिल्ह्यांना अलर्ट; विदर्भ - कोकणासह अनेक भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

- हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; मुंबई-ठाण्यासह राज्यभर पावसाचा जोर वाढणार, शेतकऱ्यांना दिलासा



मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या मान्सूनने राज्यात पुन्हा जोरदार पुनरागमन केले आहे. मुंबई, उपनगर आणि ठाण्यात रविवारी मध्यरात्रीनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. ठाण्यात अवघ्या एका तासात २९ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २२ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला असून, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर २० जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



विदर्भ, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर :


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Monsoon Update)



हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय :


हवामान विभागाच्या माहितीनुसार, देशभरात पावसासाठी पोषक अशा अनेक हवामान प्रणाली सक्रिय झाल्या आहेत. हंगामी कमी दाबाचा पट्टा पुन्हा प्रभावी झाला असून, पुढील काही दिवसांत नैऋत्य मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या आणखी काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रासह पश्चिम भारतात पावसाचा जोर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. (Maharashtra Monsoon Update)



४ जुलैपर्यंत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता :


रविवार २८ जून ते ४ जुलैदरम्यान कोकण-गोवा परिसरात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रातही अनेक भागांत पाऊस होईल, तर काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Maharashtra Monsoon Update)



सांगोल्यात पावसाचे जल्लोषात स्वागत :


दीर्घ प्रतीक्षेनंतर सांगोला तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कमलापूर परिसरात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी भर पावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. पावसामुळे खरीप हंगामातील कामांना वेग येणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. (Maharashtra Monsoon Update)



नागपुरातील शेतकऱ्याची संघर्षमय कहाणी :


नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात वीज कोसळून एका शेतकऱ्याची बैलजोडी दगावली. आर्थिक अडचणींमुळे नवीन बैलजोडी घेणे शक्य नसल्याने तानबा मरघडे या शेतकऱ्याने मित्राकडून आणलेल्या एका बैलासोबत स्वतः खांद्यावर आऊत घेऊन चार एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली. या घटनेने शेतकऱ्यांच्या संघर्षाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. (Maharashtra Monsoon Update)



भिवंडीतही पावसाचे पुनरागमन :


चार दिवसांच्या विश्रांतीनंतर भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातही पावसाने दमदार पुनरागमन केले. मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. काही ग्रामीण भागात खबरदारी म्हणून वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात आला. मात्र, धरण परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने पाणीकपातीचे संकट कायम असून, येत्या काही दिवसांत धरण क्षेत्रातही चांगला पाऊस होण्याची नागरिकांना अपेक्षा आहे. (Maharashtra Monsoon Update)


एकूणच, राज्यभर मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील काही दिवसांत अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. (Maharashtra Monsoon Update)

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून