Mumbai Rain : पावसामुळे अंधेरी सबवे बंद, शहरातील अनेक भाग जलमय; वाहतूक विस्कळीत

मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक (Traffic) विस्कळीत झाली असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.


अंधेरी, वांद्रे, खार, मालाड, गोरेगाव, जुहू आणि वर्सोवा परिसरात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अंधेरी सबवे (Andheri Subway) पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असल्याने हजारो वाहनचालकांचा खोळंबा झाला.



वेस्टर्न एक्सप्रेस हायवे (Western Express Highway) वरही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) प्रशासनाने अंधेरी सबवेमध्ये वाढत्या पाण्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री १:४५ वाजल्यापासून खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पूर्णपणे बंद केली. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.


मुंबईतील अनेक सखल भागांत पाणी साचल्याची दृश्ये समोर आली असून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. रविवारी सकाळी कार्यालये आणि इतर कामांसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडी आणि पाणी साचल्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.



दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि परिसरासाठी आजही यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. पुढील काही तासांत मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यंदा मान्सून मुंबईत तब्बल १३ दिवस उशिरा दाखल झाला असला, तरी आता पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

Holiday : मुंबईत दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनला मिळणार शासकीय सुट्टी

मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या

National Highway : राष्ट्रीय महामार्गालगत नवीन ढाबे, हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांना बंदी

राज्य सरकारचा निर्णय; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांच्या आत पाडण्याचे निर्देश मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर

Mumbai Cyber Security : मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता; भारत-इस्रायल सहकार्य वाढवण्याचे आवाहन

मुंबई: मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित बाब नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची

Charging Stations : ई-वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे विस्तारते; आरटीओ, एसटी आणि बेस्टचा पुढाकार

मुंबई : राज्यात ई-वाहनांची संख्या सातत्याने वाढत असताना त्यांना आवश्यक असलेल्या चार्जिंग पायाभूत सुविधांच्या

Devendra Fadnavis : 'एफसीआरए' विधेयकामुळे अमेरिकेतील काहींना मिरची का लागली?

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; हे विधेयक कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या विरोधात नाही मुंबई : केंद्र

BMC News : एच पूर्व विभागात पदपथ अतिक्रमण मुक्त मोहीम जोरात; नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर संयुक्त कारवाई

- अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांचे साहित्य जागच्या जागीच केले जाते नष्ट मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : सांताक्रूझ