IND vs IRE T20I : भारताला मोठा धक्का! आयर्लंडने T20I मालिका २-० ने जिंकली

IND vs IRE T20I : भारताला आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) सामन्यात अवघ्या एका धावेने पराभव (Defeat) स्वीकारावा लागला. या पराभवासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ०-२ अशा फरकाने मालिका (Series) गमावली. विशेष म्हणजे, तब्बल 1050 दिवसांनंतर भारताने टी-20 आंतरराष्ट्रीय (T20I) मालिका (Series) गमावली आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा मालिका (Series) पराभव झाला होता.


आयर्लंडने या विजयासह इतिहास रचला. कोणत्याही प्रकारात (Format) भारताविरुद्धची ही त्यांची पहिलीच मालिका (Series) जिंकण्याची कामगिरी ठरली. पहिल्या सामन्यात ३४ धावांनी विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्यांनी भारतावर मात करत मालिका (Series) २-० अशी जिंकली. प्रथम फलंदाजी (Batting) करताना आयर्लंडने २० षटकांत ८ बाद १५४ धावा केल्या. हॅरी टेक्टरने अर्धशतकी खेळी केली, तर बेंजामिन कॅलिट्झने ३७ धावांचे योगदान दिले.



१५५ धावांच्या लक्ष्याचा (Target) पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. तिलक वर्माने ४६ चेंडूत ५५ धावांची झुंजार खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेले. मात्र अखेरच्या चेंडूवर प्रिन्स यादवने षटकार ठोकूनही भारत २० षटकांत ९ बाद १५३ धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि एकाच धावेने सामना गमावला.


सामन्यानंतर भारताचा कर्णधार (Captain) श्रेयस अय्यर म्हणाला, "ही मालिका (Series) आमच्यासाठी चांगली ठरली नाही. आयर्लंडने खेळपट्टीचा (Pitch) अचूक अंदाज घेत उत्कृष्ट गोलंदाजी (Bowling) आणि क्षेत्ररक्षण (Fielding) केले. प्रत्येक विभागात त्यांनी आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली."


आयर्लंडचा कर्णधार (Captain) लॉर्कन टकर म्हणाला, "हा विजय अजूनही अविश्वसनीय वाटतो. पहिला विजय योगायोग नव्हता, हे जगाला दाखवायचे होते आणि आमच्या खेळाडूंनी ते सिद्ध करून दाखवले. भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध मालिका (Series) जिंकणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे."

Comments
Add Comment

ALL T20 : आशियाई लेजेंड्स लीगमध्ये रायडू, पठाण, दिलशान चमकणार, झाम्बियात ३० जुलैपासून सीझन २ रंगणार

नवी दिल्ली : आशियाई लेजेंड्स लीगचा बहुप्रतीक्षित दुसरा सीझन जगभरातील क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध करण्यासाठी

Commonweath Games 2026 : कॉमनवेल्थ गेम्समध्ये मोठे बदल ! प्रमुख खेळांना वगळण्यात आले, भारतावर किती होणार परिणाम ?

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२६ ची सुरुवात २३ जुलैपासून होणार आहे. यंदाची स्पर्धा स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आयोजित

P.V. Sindhu - Virat Kohli : पी. व्ही. सिंधूच्या कमबॅकमध्ये किंग कोहलीचा सिंहाचा वाटा; विराट कोहलीच्या 'त्या' एका सल्ल्याचा सिंधूवर असा झाला सकारात्मक परिणाम

- सिंधूची तब्बल दोन वर्षांनंतर मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी मुंबई : भारताची स्टार

Spain vs Argentina : अंतिम सामन्यांनंतर अर्जंटिनाला मोठा धक्का ! फिफाकडून खेळाडूंवर कारवाईची शक्यता; नेमकं प्रकरण काय ?

मुंबई : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेनने १-० ने अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अंतिम सामन्यांनंतर

FIFA WORLDCUP 2026 : स्पेनचा विश्वचषक विजेता संघ मायदेशी परतला; माद्रिदमध्ये २० लाख लोकांकडून ऐतिहासिक आणि शाही स्वागत

माद्रिद: न्यू जर्सी येथे पार पडलेल्या रोमांचक अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा १-० अशा गोलने पराभव करत विश्वचषक

Shubham Gill : कुलदीपला का डावलण्यात आलं? शुभमन गिलने दिली मोठी माहिती; निर्णय योगय होता की नाही ?

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत, इंग्लंडने २-१ ने भारतावर विजय मिळवला. या