BLO Visit :मुंबईत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण सुरू, ३० जून ते २९ जुलैदरम्यान बीएलओ घराघरात जाणार

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मतदारांच्या घरी भेट देणार असून, नागरिकांनी आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून या प्रक्रियेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी केले आहे.



या गृहभेटीदरम्यान बीएलओ मतदारांना गणना अर्ज उपलब्ध करून देतील. संबंधित अर्जामध्ये आवश्यक माहिती भरून स्वाक्षरीसह त्याची एक प्रत बीएलओंकडे जमा करावी लागणार आहे. प्रशासनाने नागरिकांना गृहभेटीपूर्वी मतदार सेवा पोर्टल किंवा ईसीनेट अॅप वर जाऊन स्वतःचा अथवा आई-वडिलांचा जुना मतदार नोंदणी तपशील (नाव, मतदारसंघ, भाग क्रमांक व अनुक्रमांक) शोधून ठेवण्याचे आवाहन केले आहे. यामुळे पुनरीक्षणाची प्रक्रिया अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.



ज्या मतदारांचा किंवा त्यांच्या आई-वडिलांचा तपशील पूर्वीच्या मतदार यादीत उपलब्ध नसेल, त्यांनी जन्मदाखला, पासपोर्ट, दहावीचे किंवा अन्य शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, शासकीय किंवा सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी अथवा निवृत्तीवेतन ओळखपत्र, कुटुंब नोंदवही, शासनाने दिलेले जमीन किंवा घरवाटप प्रमाणपत्र, वनहक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, १ जुलै १९८७ पूर्वी बँक, टपाल, एलआयसी किंवा शासनाने जारी केलेले ओळखपत्र अथवा आधार कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे. तसेच अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र देखील सोबत ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदारांनी आपल्या नावाची पडताळणी निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा एसआयआर शोध सुविधेद्वारे करून घ्यावी. अधिक माहितीसाठी नागरिकांनी नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा १८०० २२ १८५० या टोल-फ्री मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनाने नागरिकांना या विशेष पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Rain : हवामान विभागाचा 'रेड अलर्ट', मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: भारतीय हवामान विभागाने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी आगामी पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला

T20 Cricket : एलए ऑलिम्पिकसाठी क्रिकेटच्या पात्रता निकषांना आयओसीची मंजुरी

नवी दिल्ली : लॉस एंजेलिस ऑलिम्पिक २०२८ साठी क्रिकेटच्या पात्रता प्रणालीला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू

Central Government : गरजेनुसार भरता येणार अमर्याद इंधन; केंद्र सरकारचा निर्णय, ट्रान्सपोर्ट क्षेत्राला मोठा दिलासा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल खरेदीवरील २०० लिटरची कमाल मर्यादा १ जुलै २०२६ पासून हटवण्याचा

India Iran Relations : खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्र राज्यमंत्री आणि बिहारचे राज्यपाल राहणार उपस्थित

नवी दिल्ली : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या राजकीय अंत्यसंस्कार सोहळ्यात

Rajya Sabha : राज्यसभेच्या आठ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन(CP Radhkrushna) यांनी सोमवारी राज्यसभेच्या सात नवनिर्वाचित आणि