Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर






मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजनक स्थितीत असून शहरासमोरील पाणीपुरवठ्याचे आव्हान कायम आहे. जल अभियांत्रिकी विभागाच्या मास्टर कंट्रोल सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळपर्यंत सर्व तलावांमध्ये मिळून केवळ ७.०८ टक्के वापरण्यायोग्य पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या एकूण १,०२,४६० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असून तलावांची एकूण साठवण क्षमता १४,४७,३६३ दशलक्ष लिटर आहे. (Mumbai Water Supply)


अप्पर वैतरणा तलावाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. या तलावाची पातळी लोअर डेड लेव्हलच्या खाली गेल्यामुळे त्यामध्ये वापरण्यायोग्य पाणीसाठा शिल्लक नाही. या भागात केवळ ८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.


मोडक सागरमध्ये काही प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे. या तलावात १८.५० टक्के वापरण्यायोग्य पाणीसाठा असून परिसरात ६९ मिमी पाऊस झाला. तानसा तलावात १०१ मिमी पाऊस झाला असला तरी तेथे केवळ ०.४१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.


मध्य वैतरणा तलावात ११.३६ टक्के वापरण्यायोग्य पाणी आहे. या परिसरात ७१ मिमी पावसाची नोंद झाली असून २३ जूनपासून येथून नियंत्रित पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.


मुंबईला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातही केवळ ५.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या भागात ८८ मिमी पाऊस झाला आहे.


वेहर आणि तुळसी या लहान तलावांमध्ये तुलनेने समाधानकारक स्थिती आहे. वेहरमध्ये ४४.८३ टक्के, तर तुळसीमध्ये २१.१२ टक्के वापरण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे.


मागील वर्षांच्या तुलनेत यंदाचा एकत्रित पाणीसाठा कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मान्सूनचा जोर वाढणे आणि पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होणे मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.







Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)