Nashik : जिल्ह्यात लवकरच दोन अपर तहसील कार्यालये, 'याठिकाणी' असणार मुख्यालय

Nashik : नाशिक जिल्ह्यातील महसुली प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सिन्नर व लासलगाव (Sinnar and Lasalgaon) येथे स्वतंत्र अपर तहसील कार्यालये (Tehsil Office) स्थापन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पुढे आणला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर सूचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. प्रस्तावित अपर तहसील कार्यालयांमुळे स्थानिक नागरिकांना महसुली कामांसाठी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारण्याची गरज कमी होणार आहे.



सिन्नर व लासलगाव येथे प्रस्ताव


महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार प्रस्तावित अपर तहसील कार्यालयांचे मुख्यालय सिन्नर व लासलगाव येथे निश्चित करण्यात येणार आहे. महसूल व वन विभाग, मंत्रालयातील सहसचिव यांनी २१ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या पत्रानुसार नवीन कार्यालयांचे मुख्यालय व कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी सुधारित माहिती व नकाशे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव तयार केला आहे. लासलगाव आणि सिन्नर येथे स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. लासलगाव हे कांदा बाजारपेठेसाठी (Lasalgaon Onion Market) प्रसिद्ध असून परिसरात द्राक्षशेती व कृषी व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे.



तसेच सिन्नर परिसरात वाढते औद्योगिकीकरण, एमआयडीसीचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे महसुली कामांचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी अपर तहसील कार्यालयाची आवश्यकता निर्माण झाली आहे. प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही नवीन कार्यालये कार्यान्वित करण्यात येणार आहेत. प्रस्तावानुसार सिन्नर तहसील व अपर तहसील कार्यक्षेत्रात एकूण १२ महसूल मंडळांचा समावेश होणार आहे, तर लासलगाव तहसील व अपर क्षेत्रात ११ महसूल मंडळांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण २३ महसूल मंडळांतील नागरिकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे.



नागरिकांना होणारा फायदा असा


नवीन अपर तहसील कार्यालयांमुळे महसुली प्रशासनाचे विकेंद्रीकरण होणार असून लासलगाव व सिन्नर परिसरातील नागरिकांची अनेक कामे स्थानिक पातळीवरच पूर्ण होणार आहेत. सातबारा उतारा, फेरफार नोंदी, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले यांसारख्या कामांसाठी नागरिकांना निफाड किंवा सिन्नर तालुका मुख्यालयात जाण्याची गरज कमी होईल. त्यामुळे नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि त्रास वाचणार आहे. त्यामुळे नागरिकांचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे कमी होण्यास मदत होईल. कार्यक्षेत्र विभागल्यामुळे महसूल कार्यालयांवरील कामाचा ताण कमी होऊन नागरिकांना अधिक जलद व प्रभावी सेवा मिळणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना जवळच्या ठिकाणी शासकीय सेवा उपलब्ध होणार असल्याने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

Comments
Add Comment

Ro-ko Unstoppable : रोहित आणि विराटने रचला इतिहास; गांगुली-द्रविडला मागं टाकतं ही कामगिरी करणारी ठरली तिसरी जोडी

Mumbai : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना कार्डिफ येथे सुरु आहे. इंग्लंडनं टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

Indian Fishermen : शिक्षा पूर्ण होऊनही १७८ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात

कॉन्स्युलर कराराचे उल्लंघन; डहाणू-तलासरीतील १८ कुटुंबांचा न्यायासाठी आक्रोश डहाणू : भारत-पाकिस्तानदरम्यान

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या