पावसाळा (Monsoon) सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होतं, पण या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. हवेत वाढलेली आर्द्रता आणि ओलावा यामुळे बॅक्टेरिया व बुरशीची वाढ वेगाने होते. त्यामुळे काही पदार्थ खाल्ल्यास पोटाचे विकार, संसर्ग आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात आहार निवडताना सावध राहणं गरजेचं आहे. (Monsoon Diet Tips)
Nashik Crime : सातपूरच्या कामगारनगर परिसरात रविवारी सायंकाळी एका घराच्या टेरेसवर गोणीत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मृतदेह ...
'हे' पदार्थ टाळावेत
पावसाळ्यात पालक, मेथी, कोबी आणि फ्लॉवर यांसारख्या पालेभाज्या कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो. या भाज्यांवर जंतू आणि कीटकांची वाढ होण्याची शक्यता अधिक असते. त्याऐवजी कारले, दोडके, तोंडली आणि भोपळा यांसारख्या भाज्या खाणे अधिक फायदेशीर ठरू शकते. (Healthy Foods in Monsoon)
कच्च्या भाज्या आणि कच्चे स्प्राउट्स खाणेही टाळावे. त्याऐवजी भाज्या वाफवून किंवा शिजवून खाव्यात. सीफूड, विशेषतः मासे आणि इतर समुद्री खाद्यपदार्थ खाताना देखील काळजी घ्यावी. दूषित पाण्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.
पावसाळ्यात जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाणे टाळावे. समोसे, पकोडे, कचोरी यांसारखे पदार्थ चवीला छान वाटत असले तरी पचनाच्या समस्या निर्माण करू शकतात. मशरूम आणि शिमला मिरचीचे सेवनही मर्यादित ठेवावे.
मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली असून २४ ते २७ जूनदरम्यान कोकण ...
पावसात खा 'हे' पदार्थ
पावसाळ्यात आवर्जून खाण्यासारख्या दोन गोष्टी म्हणजे प्रोबायोटिक पदार्थ आणि पुरेसे पाणी. दही, ताक, चीज किंवा इतर प्रोबायोटिक पदार्थ पचनसंस्था मजबूत ठेवण्यास मदत करतात. तसेच दिवसातून पुरेसे पाणी पिल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि आरोग्य चांगले राहते. (Immunity Boosting Foods)
शक्य असल्यास उकळलेले किंवा कोमट पाणी पिण्याची सवय लावा. पावसाळ्यात योग्य आहार आणि स्वच्छतेची काळजी घेतल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते.






