DCM Sunetra Pawar : महिला शेतकऱ्यांना हक्क व सन्मान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषद


मुंबई : महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून यासंदर्भातील विधेयक अधिवेशनात मांडण्यात येणार आहे, त्यामुळे पावसाळी अधिवेशन सकारात्मक वातावरणात पार पडेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार (DCM Sunetra Pawar) यांनी पत्रकार परिषदेत (Press Conference) व्यक्त केला. यंदाचे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर केले असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.


अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात येत असलेला चहापान कार्यक्रम केवळ औपचारिक कार्यक्रम नसून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील संवादाचे प्रभावी माध्यम आहे. लोकशाहीमध्ये संवादाला महत्व असून संवादातूनच प्रश्न सुटतात, यावर आपला विश्वास आहे असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.



विधिमंडळ हे जनतेच्या अपेक्षा, प्रश्न आणि आकांक्षा मांडण्याचे सर्वोच्च व्यासपीठ असून, अधिवेशनात जनहिताचे विषय, विकासकामे आणि राज्याच्या प्रगतीशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.


जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढण्याची शासनाची भूमिका असून राज्याच्या विकासासाठी पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवक, उद्योग, शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांशी संबंधित विषयांवर सरकार सकारात्मक भूमिका मांडेल, असेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Nashik Crime News : नाशिकमधील धक्कादायक प्रकार! इमारतीच्या टेरेसवर पोत्यात आढळला तरुणाचा मृतदेह

नाशिक : शहरातील महात्मा नगर (Mahatma Nagar) परिसरातील कामगार नगर (Kamgar Nagar) भागात एका इमारतीच्या टेरेसवर (Terrace) पोत्यामध्ये एका

DCM Eknath Shinde : बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी

Monsoon News : अरबी समुद्रात चक्राकार वारे, राज्यात मान्सूनच्या प्रवासाला वेग; १ जुलैपासून मान्सून पूर्ण सक्रिय होणार

मुंबई : महाराष्ट्रात जून महिन्याच्या सुरुवातीला दाखल झालेला मान्सून गेल्या काही दिवसांपासून रखडल्यामुळे

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन

Indian Navy : भारताच्या नौदल ताफ्यात तीन स्वदेशी युद्धनौकांचा समावेश वाढती क्षमता, आत्मनिर्भरता, आधुनिकीकरणाचे प्रतीक

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत रविवारी एकाच वेळी तीन अत्याधुनिक स्वदेशी

NEET Exam : कडक सुरक्षा आणि कडक नियमांमध्ये ‘नीट’ परीक्षा उशिरा आलेल्यांना प्रवेश नाकारल्याने गोंधळ

नवी दिल्ली : ३ मे रोजी झालेली मूळ परीक्षा पेपर फुटीमुळे रद्द झाल्यानंतर, रविवारी देशभरात कडक सुरक्षेमध्ये