हिंदमाता, मिलन सबवेच्या धर्तीवर भूमिगत टाकी बांधून ठाणे खाडीत सोडणार
मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी
मुंबई : मानखुर्द महाराष्ट्रनगर येथील भुयारी मार्गात दर पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थतीवर आता उतारा सापडला आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी याठिकाणच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मिनी पंपिंग स्टेशन (Mini Pumping Station) उभारले जाणार आहे. तसेच याठिकाणी साचले जाणारे तात्काळ काढण्यासाठी भूमिगत टाकी बनवली जाणार आहे. या टाकीतील पाणी ठाणे खाडीत नेवून सोडण्यासाठी याठिकाणी १२०० मि.मी व्यासाची वाहिनी टाकली जाणार आहे.
मानखुर्द सबवे हा भाग ३१५ कॅचमेंट मधील सर्वात सखोल भाग आहे. या खोलगट भागाचा उतार ठाणे खाडी कडे असून हलक्या पावसाच्या सरींमध्येही मानखुर्द सबवे येथे पावसाचे पाणी साचण्यास सुरवात होते. परिणामी पूर्व पश्चिम वाहतूक बंद होते. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून उप पजवा विभागाच्यावतीने ३ पंप १००० घन मी प्रति तास क्षमतेचे, ४ पंप २४० घन मी प्रति तास क्षमतेचे, आणि ३ पंप २५० घन मी प्रति तास क्षमतेचे दरवर्षी पावसाळा कालावधीत बसविण्यात येतात.
दोन वर्षांनी राडारोडा उचलेल्या खचाची झाली आठवण मुंबई(विशेष प्रतिनिधी) मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) येथील महाकाय जाहिरात होर्डींग कोसळून १७ जणांचा मृत्यू ...
परंतु पंपिंग व्यवस्था ही अपुरी असल्याकारणाने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यामुळे या परिस्थितीवर उपायात्मक योजना म्हणून सहाय्यक आयुक्त एम/पूर्व यांनी मिनी पंपिंग स्टेशन स्थापन करण्यासाठीची मागणी केली. त्यानुसार या समस्येवर परिणामकारक उपाय शोधण्यासाठी पजवा विभागातील विविध अभियंत्यांनी स्थळ पाहणी केली. स्थळपाहणी अंती या ठिकाणी पिट ची व्यवस्था करून त्या मधे उच्च क्षमतेचे पंप बसवून, त्या मधील साचलेले पाणी १२०० मी मी व्यासाच्या मृदू पोलादी वाहिनी मधून जवळपास ४३० मी अंतरावर ठाणे खाडीमधे सोडणे असे याबाबत ठरविण्यात आले.
त्या अनुषगाने पजवा विभागातील नियोजन उपविभागाने १०० मी मी प्रति तास क्षमतेच्या पावसाची तीव्रता विचारात घेऊन मानखुर्द सबवे येथे जवळपास १२००० घन मी इतका पाणलोटाचा निचरा तयार होतो.
बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी वाढ बेस्ट सक्षमीकरण आणि कर्मचारी ...
त्यानुसार पजवा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर भुयारी मार्गामध्ये पाणी साचण्याची समस्या कमी करण्याच्या उद्देशाने नवीन संप पिट बांधून, संप पिट पासून ठाणे खाडी पर्यंत १२०० मी.मी. व्यासाची मृदू पोलादी वाहिनी टाकणे व ३००० घन मी प्रति तास क्षमतेचे ३ उदचंन संच भाडे तत्वावर घेऊन त्याचे पावसाळा कालावधीसाठी पुढील ४ वर्षे म्हणजे सन २०२६ ते सन २०२९ या कालावधीकरता उभारण्यात येणार आहे. यासाठी आता कंत्राटदाराची निवड करण्यात येत आहे. यासाठी १४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी म्हाळसा कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे.
अशाप्रकारे केली जाणार उपाययोजना
- मानखुर्द सबवे येथे पावसाळा कालावधीत साचलेल्या पावसाच्या पाण्याचा जलदगतीने निचरा करण्यासाठी १५ मी x ६ मी x २.२६ चे संप पिट करणे.
- संप पिट पासून ठाणे खाडी १२०० मी.मी. व्यासाची ४३० मी लांबीची मृदू पोलादी वाहिनी टाकणे.
- मानखुर्द सबवे संप पीट येथे ३००० घन मी प्रति तास क्षमतेचे ३ उदचंन संच भाडे तत्वावर घेऊन त्याचे प्रचलन व परिरक्षण पावसाळा कालावधीसाठी पुढील ४ वर्षे म्हणजे सन २०२६ ते सन २०२९करता भाडेतत्वावर