Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राहिलेल्या चारही तरुणांचे मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे.पोलीस, कोस्टगार्ड, जीवरक्षक, मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त शोधमोहीमेनंतर सर्व मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे गणपतीपुळे परिसरासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.


शनिवारी, दि. २० जून रोजी झालेल्या या दुर्घटनेत बुडालेल्या पाच जणांपैकी प्रेम दीपक आदमाने (१९) याचा मृतदेह काल सापडला होता. आदित्य संतोष राऊत (२२), अनिकेत बंडू हिवराळे (२०), आनंद राजू नरवडे (२०), आणि यश रामेश्वर कांबळे (१९) यांचे मृतदेह आज सापडले. हे सर्व युवक बिडकीन (ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी होते.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रशासन, कोस्टगार्ड, जीवरक्षक पथक तसेच स्थानिक मच्छीमार आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. समुद्रातील प्रतिकूल परिस्थिती आणि भरती-ओहोटीच्या आव्हानांवर मात करत सलग शोधमोहीम राबविण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्व युवकांचे मृतदेह शोधण्यात यश आले.शोधमोहिमेदरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर तसेच जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मोहिमेचा आढावा घेतला.

Comments
Add Comment

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह