Pune Airport : पुणे विमानतळावर अडीच कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क (कस्टम) विभागाने मोठी कारवाई करत सुमारे अडीच कोटी रुपये किमतीचा 21 किलो 500 ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. बँकॉकहून आलेल्या आंतरराष्ट्रीय विमानातील एका बेवारस बॅगेत हा अमली पदार्थ आढळून आल्याने विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकहून पुणे विमानतळावर आलेल्या विमानातील प्रवाशांनी आपापले सामान ताब्यात घेतले. मात्र, एक बॅग बराच वेळ कन्व्हेयर बेल्टवर पडून राहिल्याने अधिकाऱ्यांना संशय आला. त्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ती बॅग ताब्यात घेऊन तपासणी केली.



तपासणीदरम्यान बॅगेत मोठ्या प्रमाणात हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचे एकूण वजन 21.5 किलो असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त झाल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करी रॅकेटचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संबंधित बॅगेचा मालक कोण आहे, ती बॅग कोणत्या प्रवाशाने आणली आणि या प्रकरणामागे कोणते जाळे कार्यरत आहे, याचा शोध घेण्यासाठी सीमाशुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

Toyota Vellfire : सीट मसाजर आणि १६ हजार किलोमीटरचे मायलेज! प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्या ‘टोयोटा वेलफायर’ कारची जोरदार चर्चा

प्रख्यात वकील आणि काँग्रेस नेते डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांच्या मालकीची एक अतिशय आलिशान कार सध्या सोशल मीडियावर

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

CM Devendra Fadnavis : शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी 'डिजिटल ट्विन लर्निंग' प्रकल्प

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; कापूस,सोयाबीन,तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका पिकनिहाय शेतकऱ्यांची करणार

Tragedy in Chhatrapati Sambhajinagar : मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील दुर्घटनेने हळहळ

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि दुःखद घटना समोर आली आहे. मोबाईल

Flood in Assam : आसामच्या पाच जिल्ह्यांना पुराचा तडाखा

गुवाहाटी : आसाममध्ये पाच जिल्ह्यांतील ९२ गावांमधील १४ हजार ७९९ नागरिकांना पुराचा जबर तडाखा बसला आहे. नद्यांची

Sachin Ahir : वरळीतील मूलभूत समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात; उपसभापती सचिन अहिर

मुंबई महापालिका आयुक्तांसोबत उपसभापती सचिन अहिर यांची महत्त्वपूर्ण