गणपतीपुळे दुर्घटनेतील पाचपैकी एकाचा मृतदेह सापडला

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे आज सकाळी घडलेल्या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या पाच पर्यटकांपैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. प्रेम दीपक आदमाने (वय १९, रा. बिडकीन, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) असे त्याचे नाव असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली.



उर्वरित चार पर्यटकांचा शोध घेण्यासाठी प्रशासन, पोलीस, जीवरक्षक, स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार यांच्याकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे.घटनेची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन बगाडे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच शोधमोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या.दरम्यान, प्रेम आदमाने हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर आली असून या दुर्घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.प्रशासनाने पर्यटकांना समुद्रातील धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन खोल पाण्यात न जाण्याचे आणि जीवरक्षकांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment

Dapoli Mahabaleshwar highway : दापोली–पोलादपूर–महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गासाठी प्रवीण दरेकरांची गडकरींकडे मागणी

मुंबई : दापोली–पोलादपूरमार्गे महाबळेश्वर राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी देण्याची मागणी भाजपचे गटनेते तथा आमदार

Rice productivity : कोकणातील तांदूळ उत्पादकतेत १२ टक्क्याने घट

खारजमिनीत वाढ, हवामान बदल आणि वाढत्या नागरिकरणाचा विपरीत परिणाम रायगड : कोकण किनारपट्टीचे मुख्य, पारंपरिक आणि

Nitesh Rane : महाडला मिळणार आधुनिक मच्छी मार्केट; १५ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत रायगड जिल्ह्यातील महाड शहरात आधुनिक मच्छी मार्केट इमारत

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Ratnagiri : गणपतीपुळे दुर्घटनेतील उर्वरित चार तरुणांचे मृतदेहही सापडले

रत्नागिरी : गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी आलेल्या आणि समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या छत्रपती संभाजीनगर

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले