Maharashtra Rain Forecast: मान्सूनची गती मंदावली; राज्यातील बहुतांश भागांत उकाडा कायम

पाऊस कधी येणार? उष्णतेने नागरिक हैराण



Maharashtra Weather Update: जून महिना अर्धा संपत आला असला तरी राज्यात मान्सूनची (Monsoon) जोरदार सुरुवात अद्याप झालेली नाही. त्यामुळे अनेक भागांमध्ये उष्णता, दमट वातावरण आणि उकाड्याचा त्रास वाढला आहे. पावसाची प्रतीक्षा लांबत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. हवामान विभागाने (Weather Forecast) राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.


कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट वातावरण कायम आहे. काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता असली तरी तापमान वाढल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि घामामुळे अनेक ठिकाणी अस्वस्थता जाणवत आहे. (Maharashtra Weather Update)



पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत आवश्यक असल्याशिवाय बाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.


मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम असून तापमानात वाढ झाली आहे. परभणी आणि हिंगोली भागात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही उष्ण आणि कोरडे हवामान कायम आहे.



विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. काही भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Rain Alert Maharashtra)


दरम्यान, २० जूननंतर मान्सूनला गती मिळू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तोपर्यंत नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, उन्हात जाणे टाळणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.


Comments
Add Comment

Moshi building collapse : मोशी इमारत दुर्घटना : एकाचा मृत्यू, सहा जण अद्याप ढिगाऱ्याखाली; २२ तासांपासून बचावकार्य सुरू

पुणे : मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील दुमजली इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत

Chakur Bus Accident : चाकूरमध्ये शाळेची बस पलटून २२ विद्यार्थी जखमी प्रकरणी चालकासह मुख्याध्यापक व संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर : जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पलटी होऊन २२ विद्यार्थी जखमी झाल्याची

Nasrapur Case : जिलेबीची ऑर्डर नसती तर... ;नसरापूर हत्याकांडातला धक्कादायक खुलासा समोर

पुणे : नसरापूर (Nasrapur) येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात दोषीला अवघ्या दोन महिन्यांत फाशीची शिक्षा

Veer Jeevaji Mahale : प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार; प्रथम टप्प्यात 1 कोटींचा निधी

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा; ‘अमृत भारत’ एक्स्प्रेस आजपासून दररोज धावणार

Jalgaon : भुसावळ–उधना मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उधना–ब्रह्मपूर अमृत भारत

Hingoli News : घटस्फोट न घेताच पोलीस कर्मचाऱ्याचे दुसरे लग्न; रोखण्यासाठी आलेल्या पत्नीला बेदम मारहाण

हिंगोली : पोलीस कर्मचाऱ्यानेच कायद्याचे उल्लंघन (Violation of Law) केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे